शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

देवभक्तांनी मंदिरांची कुलपे तोडावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : कोरोना हे थाेतांड असून, लोकांना भित्रट करण्यासाठी केलेले एक प्रकारचे षडयंत्र आहे. या भित्रटपणामुळेच सध्या कोणी रस्त्यावर ...

सांगली : कोरोना हे थाेतांड असून, लोकांना भित्रट करण्यासाठी केलेले एक प्रकारचे षडयंत्र आहे. या भित्रटपणामुळेच सध्या कोणी रस्त्यावर उतरत नाही. राज्यातील देवभक्तांनी आता सर्व मंदिरांची कुलपे तोडून प्रवेश करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष स्वार्थी आहे. त्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही. लॉकडाऊन कशाला हवाय? सर्व दुकाने खुली करा. बाजार सुरू झाल्यानंतर देशाचे काहीही वाटोळे होणार नाही. लॉकडाऊनमुळेच वाटोळे झाले आहे.

देशातील जनतेला भित्रट, नेभळट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शूर-विरांचा हा देश आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मृत्यूच्या भयावर विजय मिळविला. ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. पंढरीची वारी म्हणजे देशाचा आत्मा आहे. त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. वारी केल्याने कोणीही मरणार नाही. देवांवर खरी श्रद्धा असणाऱ्या तमाम वारकऱ्यांनी, देवभक्तांनी आता मंदिरांची कुलपे तोडून प्रवेश करावा. मंदिर बंद करायचे कारण काय? भगवंताच्या वारीमुळेच, उपासनेमुळेच देशसेवेची ज्योत निर्माण होत असते. धैर्य, शौर्य, हिमतीला, लढाऊपणाला आपण सोडचिठ्ठी देत चाललो आहोत, त्याचे देशाला वाईट परिणाम भोगावे लागेल.

चौकट

एकही पक्ष अपवाद नाही

देशातील राजकारणी काय लायकीचे आहे हे आता लोकांना कळाले आहे. ते देशाचे सेवक नव्हेत, तर स्वत:चे पोशिंदे आहेत. सर्वच पक्ष एकजात असे आहेत. कोणीही त्याला अपवाद नाही, असेही भिडे म्हणाले.