शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ ...

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ व २०१९ च्या तुलनेत कोरोनाच्या काळात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ८ टक्क्यांनी घट झाली आहे.

सांगली जिल्ह्यात गेली वर्षभर कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात लॉकडाऊनमुळे महामंदीचे चटके हजारो लोकांना सोसावे लागले; पण या चटक्यांपेक्षा जगणे व कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची मानून अनेकांनी लढण्याचा निर्धार केला. त्याचेच सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संकटामुळे आत्महत्येच्या मोजक्या घटना घडल्या, मात्र त्यानंतर सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवण्यासाठी जनजागृती केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

चौकट

अशी आहे आत्महत्येची आकडेवारी

२०१८ ५९५

२०१९ ६१६

२०२० ५६७

चौकट

जीव माझा मोलाचा, आधार मी कुटुंबाचा

मिरजेतील मानसोपचारतज्ज्ञ चंद्रशेखर हळिंगळे यांनी सांगितले की, कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. ज्यांना लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागले त्यांना धावाधाव न करताही, कमी खर्चातही चांगले जगता येऊ शकते याची जाणीव झाली.

बाहेरचा ताण कमी होऊन कुटुंबाचे सुख, त्यांचे पाठबळ लाभल्यानेही लोकांचे मनोबल वाढले. सकारात्मक विचाराकडे त्यांची पावले पडली. जीव मोलाचा आहे व कुटुंबाला आपला आधार आहे, याचीही जाणीव प्रबळ झाली.

लोक व्यायाम करू लागल्याने त्यांचे शरीर व मनाचे आरोग्यही चांगले झाले

व्यसनांच्या आहारी जाऊन होणाऱ्या आत्महत्याही थांबल्या.

चौकट

कोरोनामुळे झालेल्या आत्महत्येने कार्यकर्ते हादरले

जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील दुधगाव येथे एकाने कोरोनाच्या उपचाराचे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. या घटनेने जिल्हा हादरला. सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबाला मदत करतानाच अशा घटना घडू नयेत म्हणून जनजागृती केली. जून २०२० मध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली. सप्टेंबर २०२० मध्ये सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने गळ्यावर धारधार चाकूने वार करून आत्महत्या केली. अशा सुमारे १० घटना जिल्ह्यात कोरोना काळात घडल्या.