शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ ...

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ व २०१९ च्या तुलनेत कोरोनाच्या काळात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ८ टक्क्यांनी घट झाली आहे.

सांगली जिल्ह्यात गेली वर्षभर कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात लॉकडाऊनमुळे महामंदीचे चटके हजारो लोकांना सोसावे लागले; पण या चटक्यांपेक्षा जगणे व कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची मानून अनेकांनी लढण्याचा निर्धार केला. त्याचेच सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संकटामुळे आत्महत्येच्या मोजक्या घटना घडल्या, मात्र त्यानंतर सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवण्यासाठी जनजागृती केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

चौकट

अशी आहे आत्महत्येची आकडेवारी

२०१८ ५९५

२०१९ ६१६

२०२० ५६७

चौकट

जीव माझा मोलाचा, आधार मी कुटुंबाचा

मिरजेतील मानसोपचारतज्ज्ञ चंद्रशेखर हळिंगळे यांनी सांगितले की, कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. ज्यांना लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागले त्यांना धावाधाव न करताही, कमी खर्चातही चांगले जगता येऊ शकते याची जाणीव झाली.

बाहेरचा ताण कमी होऊन कुटुंबाचे सुख, त्यांचे पाठबळ लाभल्यानेही लोकांचे मनोबल वाढले. सकारात्मक विचाराकडे त्यांची पावले पडली. जीव मोलाचा आहे व कुटुंबाला आपला आधार आहे, याचीही जाणीव प्रबळ झाली.

लोक व्यायाम करू लागल्याने त्यांचे शरीर व मनाचे आरोग्यही चांगले झाले

व्यसनांच्या आहारी जाऊन होणाऱ्या आत्महत्याही थांबल्या.

चौकट

कोरोनामुळे झालेल्या आत्महत्येने कार्यकर्ते हादरले

जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील दुधगाव येथे एकाने कोरोनाच्या उपचाराचे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. या घटनेने जिल्हा हादरला. सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबाला मदत करतानाच अशा घटना घडू नयेत म्हणून जनजागृती केली. जून २०२० मध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली. सप्टेंबर २०२० मध्ये सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने गळ्यावर धारधार चाकूने वार करून आत्महत्या केली. अशा सुमारे १० घटना जिल्ह्यात कोरोना काळात घडल्या.