शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

म्हैसाळ योजना : पाटबंधारेचे ढिसाळ व्यवस्थापन

नरवाड : पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या पाणी मागणी अर्जाबाबत शेतकऱ्यांतून उदासीनता दिसून येत आहे. थकित पाणीपट्टीअभावी कृष्णा खोरेच्या म्हैसाळ प्रकल्पाची वीज जोडणी विद्युत वितरण कंपनीने तोडली आहे, असा आरोप पाटबंधारे खाते शेतकऱ्यांवर नेहमीच करीत आहे. मात्र हंगामनिहाय नियमित आवर्तने सुरू ठेवल्यास पाणीपट्टी भरण्यास शेतकरी कचरणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. पाटबंधारे खात्याकडे पाणी सोडण्याची कोणतीही ठोस भूमिका नसल्याने आजवर पिके वाळून गेल्यानंतरच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. यातही निकृष्ट दर्जाच्या कामाच्या फटक्यामुळे पाणी गळतीचा बोजा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत, मात्र पाटबंधारे खात्याने आकारलेली पाणीपट्टीच शेतकऱ्यांना मान्य नाही. म्हैसाळ प्रकल्पाच्या अपुऱ्या कामाचाही परिणाम पाणीपट्टीच्या दरवाढीवर होत आहे. पाणी पोहोचल्यास पाणीपट्टी भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्यात येणार आहे. राज्य शासनाच्या टंचाई निधीतून थकित वीज देयके आजवर वेळोवेळी भरली गेल्याने शेतकऱ्यांना शेतीस पाणी सहजगत्या मिळत होते. मात्र चालू शासनाने पाणी सोडण्यास ताठर भूमिका घेतल्याने भविष्यात म्हैसाळ प्रकल्पातून पाणी मिळणे कठीण होणार आहे. म्हैसाळ प्रकल्पाच्या खंडित पाणी पुरवठ्यामुळे कोणतीही खात्रीशीर पिके घेता येत नसल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत अडकला आहे. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ होत आहे. दरम्यान, एक एप्रिलच्या शासनाच्या अध्यादेशाला शेतकरी कितपत प्रतिसाद देतात, यावर म्हैसाळ प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करून पाणी मागणीच्या अर्जाबरोबर शेतकऱ्यांना दिले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ प्रकल्पाचे पाणाी पाजले नाही, पण त्यांच्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना एकरी मायनर पद्धत अवलंबली पाहिजे.- नेताजीराव निंबाळकर, प्रगतशील शेतकरी, नरवाड (ता. मिरज)लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरजम्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद राहिल्यामुळे उन्हाळी पिके वाळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणीपट्टी भरण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.