शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विटा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम ...

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामात जबरदस्तीने इतर पिकांकडे वळविण्याचा घाट कृषी अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या खानापूर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने बदली करावी; अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.

ते म्हणाले, शासनाकडून तालुका कृषी खात्याकडे येणाऱ्या योजना विविध प्रकारचे बियाणे व खते यांचा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा होताना दिसत नाही. उलट काही स्थानिक पातळीवरील गावपुढाऱ्यांना मॅनेज करून या कृषी योजना तेथेच मुरविण्याचा प्रकार कृषी खात्याकडून सुरू आहे.

गेल्यावर्षी अग्रणी नदीला आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीबाबत एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. या सर्व प्रकाराकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळू शकला नाही. याचा विचार करून खानापूर तालुक्यात असलेले निष्क्रिय तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांची बदली न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.