शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

विटा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम ...

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामात जबरदस्तीने इतर पिकांकडे वळविण्याचा घाट कृषी अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या खानापूर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने बदली करावी; अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.

ते म्हणाले, शासनाकडून तालुका कृषी खात्याकडे येणाऱ्या योजना विविध प्रकारचे बियाणे व खते यांचा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा होताना दिसत नाही. उलट काही स्थानिक पातळीवरील गावपुढाऱ्यांना मॅनेज करून या कृषी योजना तेथेच मुरविण्याचा प्रकार कृषी खात्याकडून सुरू आहे.

गेल्यावर्षी अग्रणी नदीला आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीबाबत एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. या सर्व प्रकाराकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळू शकला नाही. याचा विचार करून खानापूर तालुक्यात असलेले निष्क्रिय तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांची बदली न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.