शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

विटा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम ...

झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामात जबरदस्तीने इतर पिकांकडे वळविण्याचा घाट कृषी अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या खानापूर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने बदली करावी; अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.

ते म्हणाले, शासनाकडून तालुका कृषी खात्याकडे येणाऱ्या योजना विविध प्रकारचे बियाणे व खते यांचा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा होताना दिसत नाही. उलट काही स्थानिक पातळीवरील गावपुढाऱ्यांना मॅनेज करून या कृषी योजना तेथेच मुरविण्याचा प्रकार कृषी खात्याकडून सुरू आहे.

गेल्यावर्षी अग्रणी नदीला आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीबाबत एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. या सर्व प्रकाराकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळू शकला नाही. याचा विचार करून खानापूर तालुक्यात असलेले निष्क्रिय तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांची बदली न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.