शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार ...

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला

पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन

आटपाडी : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते. जमिनीचा कस टिकून राहतो. हळूहळू शेतीतील उत्पादन वाढत जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीला आवश्यक असे सर्व पोषक घटक शेणखतातून उपलब्ध होतात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

तासगावमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी

तासगाव : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. आरोग्य प्रशासनाचे कोरोनाबाबत योग्य ती दखल घेत आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. यामुळे अपघात होतात. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे अशा रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी रेडिअम बसविण्याची मागणी होत आहे.

आठवडा बाजार बंंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्यात करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मिरज तालुक्यातीलही सर्व बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

संजयनगर : गत काही महिन्यांत वाहनांची संख्या वाढल्याने तसेच वाहतूक नियमांचे पालन न करण्यात येत असल्याने अपघात वाढले आहेत. हेल्मेट नसल्याने अनेक दुचाकीस्वार प्राणाला मुकतात. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद गरजेचा आहे.