शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार ...

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला

पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन

आटपाडी : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते. जमिनीचा कस टिकून राहतो. हळूहळू शेतीतील उत्पादन वाढत जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीला आवश्यक असे सर्व पोषक घटक शेणखतातून उपलब्ध होतात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

तासगावमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी

तासगाव : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. आरोग्य प्रशासनाचे कोरोनाबाबत योग्य ती दखल घेत आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. यामुळे अपघात होतात. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे अशा रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी रेडिअम बसविण्याची मागणी होत आहे.

आठवडा बाजार बंंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्यात करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मिरज तालुक्यातीलही सर्व बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

संजयनगर : गत काही महिन्यांत वाहनांची संख्या वाढल्याने तसेच वाहतूक नियमांचे पालन न करण्यात येत असल्याने अपघात वाढले आहेत. हेल्मेट नसल्याने अनेक दुचाकीस्वार प्राणाला मुकतात. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद गरजेचा आहे.