शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मिरजेत धूर फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार ...

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला

पलूस : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन

आटपाडी : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते. जमिनीचा कस टिकून राहतो. हळूहळू शेतीतील उत्पादन वाढत जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीला आवश्यक असे सर्व पोषक घटक शेणखतातून उपलब्ध होतात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

तासगावमध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी

तासगाव : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. आरोग्य प्रशासनाचे कोरोनाबाबत योग्य ती दखल घेत आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. यामुळे अपघात होतात. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे अशा रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी रेडिअम बसविण्याची मागणी होत आहे.

आठवडा बाजार बंंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्यात करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मिरज तालुक्यातीलही सर्व बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

संजयनगर : गत काही महिन्यांत वाहनांची संख्या वाढल्याने तसेच वाहतूक नियमांचे पालन न करण्यात येत असल्याने अपघात वाढले आहेत. हेल्मेट नसल्याने अनेक दुचाकीस्वार प्राणाला मुकतात. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद गरजेचा आहे.