शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST

वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी जत : वन विभाग व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात ...

वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी

जत : वन विभाग व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दिशादर्शक फलक लावण्याची गरज

शिराळा : शिराळा तालुक्यातील विविध मार्गावरील अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची दिशा वाऱ्यामुळे बदलली आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांची फसगत होत असते. या रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

तासगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु, अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असून, गर्दीही केली जात आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

काेराेनाबाधिताचा परिसर निर्जंतुक करा

नेलकरंजी : आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात येत होता. मात्र आता केवळ ज्या घरी रुग्ण आढळला, तेथे बोर्ड लावून प्रशासन मोकळे होते; परंतु, परिसर सॅनिटाईझ करीत नाहीत. त्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती आहे.

संचारबंदीला प्रतिसाद

बुधगाव : माधवनगर (ता. मिरज) येथे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला. औषध दुकानांसह अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद हाेते. नागरिकांनीही विनाकारण रस्त्यावर येणे टाळले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी औषध फवारणीही केली आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर पथदिवे बंद

सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर प्रमुख चौक असलेल्या कर्मवीर चाैक ते विश्रामबाग यादरम्यानचे काही पथदिवे रात्री बंद असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. हे पथदिवे नियमितपणे सुरू ठेवावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा नागरिकांनी इशारा दिला आहे.