शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाण्यावरुन उपमहापौरांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी येत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने उपमहापौर उमेश पाटील यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेत धारेवर धरले. येत्या आठ दिवसात नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्याचे आदेशही पाटील यांनी दिले.

प्रभाग समिती एकच्या कार्यक्षेत्रातील संजयनगर, खणभाग, माळी गल्ली, राजनगर, घनश्याम नगर, जगदाळे प्लॉट, गोसावी गल्ली यासह उपनगरात गेल्या काही दिवसापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. माळी गल्ली येथील महिलांनी उपमहापौरांची भेट घेऊन पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी उपमहापौर पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी का मिळत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

याबाबत पाटील म्हणाले की, माळबंगला व हिराबाग वॉटर वर्क्स येथून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यातच जॅकवेलवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पुरेशा दाबाने पाणी देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात तीन तास पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात दीड ते दोन तासच नागरिकांना पाणी मिळते. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच उपनगरात अनेक बोगस कनेक्शन आहेत. त्याचा सर्वे करून हे कनेक्शन बंद करण्याची सूचनाही केली आहे. माळबंगला येथे जुने पंप, पाईप मोठ्या प्रमाणात पडून आहेत. ते भंगार चोरीला जात असून त्याचा लिलाव काढण्याबरोबरच तेथे सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

माळ बंगलाजवळच पाणीटंचाई

महापालिकेचे मुख्य जलशुद्धिकरण केंद्र माळ बंगला येथे आहे पण याच परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले. तर नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी पाणी राहू द्या, किमान माळ बंगल्याच्या टाकीची सावली तरी आम्हाला द्या, असा टोला अधिकाऱ्यांना लगावला.

चौकट

गळतीचे कर्मचारी अन्य विभागात

जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी महापालिकेने मानधनावर २२ कर्मचारी घेतले आहेत. त्यापैकी ५० टक्के हून अधिक कर्मचारी कामावरच नसतात. काहींनी खोटी प्रमाणपत्रे सादर करून अन्य विभागात बदली करून घेतल्याचा आरोप उपमहापौर पाटील यांनी केला.