शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाण्यावरुन उपमहापौरांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी येत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने उपमहापौर उमेश पाटील यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेत धारेवर धरले. येत्या आठ दिवसात नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्याचे आदेशही पाटील यांनी दिले.

प्रभाग समिती एकच्या कार्यक्षेत्रातील संजयनगर, खणभाग, माळी गल्ली, राजनगर, घनश्याम नगर, जगदाळे प्लॉट, गोसावी गल्ली यासह उपनगरात गेल्या काही दिवसापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. माळी गल्ली येथील महिलांनी उपमहापौरांची भेट घेऊन पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी उपमहापौर पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी का मिळत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

याबाबत पाटील म्हणाले की, माळबंगला व हिराबाग वॉटर वर्क्स येथून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यातच जॅकवेलवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पुरेशा दाबाने पाणी देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात तीन तास पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात दीड ते दोन तासच नागरिकांना पाणी मिळते. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच उपनगरात अनेक बोगस कनेक्शन आहेत. त्याचा सर्वे करून हे कनेक्शन बंद करण्याची सूचनाही केली आहे. माळबंगला येथे जुने पंप, पाईप मोठ्या प्रमाणात पडून आहेत. ते भंगार चोरीला जात असून त्याचा लिलाव काढण्याबरोबरच तेथे सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

माळ बंगलाजवळच पाणीटंचाई

महापालिकेचे मुख्य जलशुद्धिकरण केंद्र माळ बंगला येथे आहे पण याच परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले. तर नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी पाणी राहू द्या, किमान माळ बंगल्याच्या टाकीची सावली तरी आम्हाला द्या, असा टोला अधिकाऱ्यांना लगावला.

चौकट

गळतीचे कर्मचारी अन्य विभागात

जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी महापालिकेने मानधनावर २२ कर्मचारी घेतले आहेत. त्यापैकी ५० टक्के हून अधिक कर्मचारी कामावरच नसतात. काहींनी खोटी प्रमाणपत्रे सादर करून अन्य विभागात बदली करून घेतल्याचा आरोप उपमहापौर पाटील यांनी केला.