शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत ...

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने परिशिष्ट नऊ मधून आरक्षण दिले असते तर त्यास धक्का लागला नसता अशीही प्रतिक्रिया विधिज्ञांनी दिली. तर आता पुन्हा एकदा संघर्षाची वेळ मराठा समाजावर आल्याची माहिती आरक्षणाच्या मुद्यावर लढणाऱ्या कार्यकर्ते यांनी दिली.

कोट

मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण घटनाबाह्य ठरविले आहे. केंद्र सरकारने परिशिष्ट ९ मध्ये बदल करून आरक्षण दिले असते तर त्यास अडचण नव्हती. आता केंद्र सरकारवर मराठा समाजातील प्रत्येकाने दबाव आणावा व आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. न्यायालयास शिव्या, शाप देण्यात वेळ न घालविता केंद्र सरकारकडून आरक्षण मिळविण्यासाठी आता प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ॲड. के. डी. शिंदे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ

कोट

न्यायालयाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्दबातल ठरविल्याने समाजासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तरीही समाजाच्या भावना आणि रास्त असलेली मागणी मान्य झालेली नाही. समाजातील घटकांनी यावर तत्काळ व्यक्त न होता संयम पाळावा व आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

डॉ. संजय पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

महाराष्ट्रावर ज्या ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी मराठा समाज त्या सोडविण्यासाठी पुढे सरसावला आहे. मात्र, आता मराठा समाजातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवू शकलो नाही हे दुर्दैवी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला धोका दिला आहे. आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणच मोट बांधायला हवी.

प्रवीण पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

अठ्ठावन्न मोर्चे शांततेत काढून ५५ जणांनी बलिदान देऊन आरक्षणाचा मुद्दा रेटला होता. आता घटनेतील समानता या शब्दावरील विश्वास उडाला आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तितकेच जबाबदार आहे. दोन्ही सरकारांनी प्रयत्न केले नसल्याने मराठा समाजाची फसवणूक झाली. दोन्ही सरकारचा निषेध करत आहे.

विलास देसाई, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

केवळ राजकीय फायद्यासाठीच मराठा समाजाचा घात करण्यात आला आहे. न्यायालयाकडून दुसऱ्यांदा मराठ्यांचा हक्क हिरावण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी मराठा समाजाला काहीही मदत केली नाही. आता राज्य सरकारने ५० टक्के मधील आरक्षण रद्द करून सरसकट ओबीसीमध्ये समाजाचा समावेश करावा यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे.

प्रशांत भोसले, मराठा आरक्षण विषयक याचिकाकर्ते