शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत ...

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने परिशिष्ट नऊ मधून आरक्षण दिले असते तर त्यास धक्का लागला नसता अशीही प्रतिक्रिया विधिज्ञांनी दिली. तर आता पुन्हा एकदा संघर्षाची वेळ मराठा समाजावर आल्याची माहिती आरक्षणाच्या मुद्यावर लढणाऱ्या कार्यकर्ते यांनी दिली.

कोट

मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण घटनाबाह्य ठरविले आहे. केंद्र सरकारने परिशिष्ट ९ मध्ये बदल करून आरक्षण दिले असते तर त्यास अडचण नव्हती. आता केंद्र सरकारवर मराठा समाजातील प्रत्येकाने दबाव आणावा व आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. न्यायालयास शिव्या, शाप देण्यात वेळ न घालविता केंद्र सरकारकडून आरक्षण मिळविण्यासाठी आता प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ॲड. के. डी. शिंदे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ

कोट

न्यायालयाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्दबातल ठरविल्याने समाजासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तरीही समाजाच्या भावना आणि रास्त असलेली मागणी मान्य झालेली नाही. समाजातील घटकांनी यावर तत्काळ व्यक्त न होता संयम पाळावा व आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

डॉ. संजय पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

महाराष्ट्रावर ज्या ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी मराठा समाज त्या सोडविण्यासाठी पुढे सरसावला आहे. मात्र, आता मराठा समाजातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवू शकलो नाही हे दुर्दैवी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला धोका दिला आहे. आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणच मोट बांधायला हवी.

प्रवीण पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

अठ्ठावन्न मोर्चे शांततेत काढून ५५ जणांनी बलिदान देऊन आरक्षणाचा मुद्दा रेटला होता. आता घटनेतील समानता या शब्दावरील विश्वास उडाला आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तितकेच जबाबदार आहे. दोन्ही सरकारांनी प्रयत्न केले नसल्याने मराठा समाजाची फसवणूक झाली. दोन्ही सरकारचा निषेध करत आहे.

विलास देसाई, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

कोट

केवळ राजकीय फायद्यासाठीच मराठा समाजाचा घात करण्यात आला आहे. न्यायालयाकडून दुसऱ्यांदा मराठ्यांचा हक्क हिरावण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी मराठा समाजाला काहीही मदत केली नाही. आता राज्य सरकारने ५० टक्के मधील आरक्षण रद्द करून सरसकट ओबीसीमध्ये समाजाचा समावेश करावा यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे.

प्रशांत भोसले, मराठा आरक्षण विषयक याचिकाकर्ते