शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत निर्णय होईना; भाजपची नेतेमंडळी द्विधा मन:स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:17 IST

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सांगलीतील भाजपच्या नेत्यांची चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत वरिष्ठ ...

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सांगलीतील भाजपच्या नेत्यांची चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत असल्याची चर्चा शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रंगली होती.जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी बारा सदस्यांनी चार दिवसांपूर्वी बंड केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. बुधवारी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आम्ही आदेश देत नाही, तोपर्यंत तुमचे काम सुरू ठेवा. योग्यवेळी निर्णय घेऊ, असे सांगून परत पाठवले.त्यानंतर देशमुख यांनी लगेच जिल्हा परिषदेच्या कारभारात सहभाग घेतला. बदलाची मागणी करणाऱ्या काही सदस्यांनी शुक्रवारी देशमुख यांची भेट घेऊन, अध्यक्ष, उपाध्यक्ष कायम ठेवून उर्वरित सभापतींचे राजीनामे घ्यावेत आणि आम्हाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. देशमुख यांनी सांगितले की, पक्षाने आदेश दिला तर लगेच राजीनामा देण्यास तयार आहे. पदाला चिकटून बसणार नाही. पण, नेत्यांचा आदेश नसताना राजीनामा देणे चुकीचे आहे. त्याने नेत्यांच्या विश्वासाला तडा जाईल.कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवार, दि. ४ रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सोमवार अथवा मंगळवारी मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. या बैठकीस तुम्हाला आणि जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावले जाईल. त्यावेळी सर्वांची मते जाणून घेऊन पदाधिकारी बदलाचे ठरवू, असे आश्वासन दिले. खा. पाटील यांनीच ही माहिती दिली.जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत आहेत. नेत्यांच्या या भूमिकेबाबत सदस्यांमध्ये शुक्रवारी उलट-सुलट चर्चा रंगली होती.पदाधिकारी बदलाबाबत आग्रही असलेल्या सदस्यांनी सांगितले की, नेत्यांनी आमची भूमिका समजून घेऊनच निर्णय घ्यावा. येत्या चार दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत काय भूमिका घेतात, त्यावरच पुढील वाटचाल ठरणार आहे. इच्छुक सदस्यांची ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशी भूमिका आहे.