शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत निर्णय होईना; भाजपची नेतेमंडळी द्विधा मन:स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:17 IST

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सांगलीतील भाजपच्या नेत्यांची चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत वरिष्ठ ...

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काम सुरू ठेवा, वेळ आल्यावर निर्णय घेण्याचे सांगून परत पाठविले आहे, तर खासदार संजयकाका पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सांगलीतील भाजपच्या नेत्यांची चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत असल्याची चर्चा शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रंगली होती.जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी बारा सदस्यांनी चार दिवसांपूर्वी बंड केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. बुधवारी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आम्ही आदेश देत नाही, तोपर्यंत तुमचे काम सुरू ठेवा. योग्यवेळी निर्णय घेऊ, असे सांगून परत पाठवले.त्यानंतर देशमुख यांनी लगेच जिल्हा परिषदेच्या कारभारात सहभाग घेतला. बदलाची मागणी करणाऱ्या काही सदस्यांनी शुक्रवारी देशमुख यांची भेट घेऊन, अध्यक्ष, उपाध्यक्ष कायम ठेवून उर्वरित सभापतींचे राजीनामे घ्यावेत आणि आम्हाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. देशमुख यांनी सांगितले की, पक्षाने आदेश दिला तर लगेच राजीनामा देण्यास तयार आहे. पदाला चिकटून बसणार नाही. पण, नेत्यांचा आदेश नसताना राजीनामा देणे चुकीचे आहे. त्याने नेत्यांच्या विश्वासाला तडा जाईल.कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवार, दि. ४ रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सोमवार अथवा मंगळवारी मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. या बैठकीस तुम्हाला आणि जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावले जाईल. त्यावेळी सर्वांची मते जाणून घेऊन पदाधिकारी बदलाचे ठरवू, असे आश्वासन दिले. खा. पाटील यांनीच ही माहिती दिली.जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत भाजपचे वरिष्ठ नेते द्विधा मन:स्थितीत आहेत. नेत्यांच्या या भूमिकेबाबत सदस्यांमध्ये शुक्रवारी उलट-सुलट चर्चा रंगली होती.पदाधिकारी बदलाबाबत आग्रही असलेल्या सदस्यांनी सांगितले की, नेत्यांनी आमची भूमिका समजून घेऊनच निर्णय घ्यावा. येत्या चार दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत काय भूमिका घेतात, त्यावरच पुढील वाटचाल ठरणार आहे. इच्छुक सदस्यांची ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशी भूमिका आहे.