शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:44 IST

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा ...

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा केंद्रात सुरू आहे.आॅनलाईन अर्ज सादर करताना बँका, सेवा सोसायटी व महाईसेवा केंद्रांमध्ये आॅनलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आला असून, नमुना अर्ज परिपूर्ण भरून दिल्यानंतर त्यावरील माहिती आॅनलाईन अचूक भरली जात आहे.एका बाजूला खरीप हंगामातील शेतीची रखडलेली कामे व दुसºया बाजूला कर्जमाफी मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम यामुळे शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील १३० महाईसेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली आहे.आॅनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता महाईसेवा केंद्रात जाताना शेतकºयांनी पती-पत्नीचे आधार कार्ड, बँकचे पासबुक, सेव्हिंग व लोन अकाऊंट दोन्हीही, पेन्शनर असतील तर पीपीओ नंबर व पॅनकार्ड उपलब्ध असल्यास सोबत ठेवणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर कर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या कर्जाचा तपशील देण्याचे काम बँका, सेवा सोसायटी यांनी करणे गरजेचे आहे.ज्या गावची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे, अशा गावांमधील शेतकºयांना त्यांची कर्जे थकल्यावर शासनामार्फत पुनर्गठन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु ५० पैशांवरील पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.अचूक तपशील देणे गरजेचेसर्व बँका व विकास सेवा सोसायटी यांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जाचा तपशील अचूक देणे गरजेचे आहे. बºयाचशा बँका शेतकºयांना त्यांना कर्जाचा योग्य तपशील देताना टाळाटाळ करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत असून, बँकांची प्रशासनाने चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.