शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कर्जमाफी पायजे रं... कोन्चं बटण दाबू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:44 IST

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा ...

महेंद्र गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : वेगवेगळे निकष लावून राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकºयांना ही कर्जमाफी मिळविण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी असलेल्या महाईसेवा केंद्रांची मदत शेतकºयांना मिळत असून, कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असून, कर्जमाफी पायजे रं... कोन्च बटण दाबू, अशी चर्चा महाईसेवा केंद्रात सुरू आहे.आॅनलाईन अर्ज सादर करताना बँका, सेवा सोसायटी व महाईसेवा केंद्रांमध्ये आॅनलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आला असून, नमुना अर्ज परिपूर्ण भरून दिल्यानंतर त्यावरील माहिती आॅनलाईन अचूक भरली जात आहे.एका बाजूला खरीप हंगामातील शेतीची रखडलेली कामे व दुसºया बाजूला कर्जमाफी मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम यामुळे शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील १३० महाईसेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली आहे.आॅनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता महाईसेवा केंद्रात जाताना शेतकºयांनी पती-पत्नीचे आधार कार्ड, बँकचे पासबुक, सेव्हिंग व लोन अकाऊंट दोन्हीही, पेन्शनर असतील तर पीपीओ नंबर व पॅनकार्ड उपलब्ध असल्यास सोबत ठेवणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर कर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या कर्जाचा तपशील देण्याचे काम बँका, सेवा सोसायटी यांनी करणे गरजेचे आहे.ज्या गावची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे, अशा गावांमधील शेतकºयांना त्यांची कर्जे थकल्यावर शासनामार्फत पुनर्गठन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु ५० पैशांवरील पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.अचूक तपशील देणे गरजेचेसर्व बँका व विकास सेवा सोसायटी यांनी शेतकºयांना त्यांच्या कर्जाचा तपशील अचूक देणे गरजेचे आहे. बºयाचशा बँका शेतकºयांना त्यांना कर्जाचा योग्य तपशील देताना टाळाटाळ करीत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत असून, बँकांची प्रशासनाने चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.