शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

कर्जमाफीच्या व्याजाचे साडेआठ कोटी शेतकऱ्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

ते म्हणाले, शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणीस वेळ लागत होता. यामुळे जिल्हा ...

ते म्हणाले, शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणीस वेळ लागत होता. यामुळे जिल्हा बँकेला मोठा फटका बसत होता. परिणामी जिल्हा बँकेत विकास सोसायट्यांकडून व्याज वसूल केले होते. त्यानंतर शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पार पाडली. बँकेने घेतलेले व्याज परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७६६ सोसायट्यांतील ६६ हजार २८ सभासदांना आठ कोटी ५२ लाख ८० हजार ३० रुपयांची परत केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्याज परत केलेल्या सोसायट्या, सभासद व रक्कम (लाखात) तालुकानिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. शिराळा तालुक्यातील ९० सोसाट्यांमधील दोन हजार ८५२ सभासदांना २६ लाख ९८ हजार ७२४, वाळवा तालुक्यातील १३० सोसायट्यांचे सात हजार ५४ सभासदांना ८१ लाख ७० हजार ७७३, मिरज तालुक्यातील ६९ सोसायटीच्या नऊ हजार ३२ सभासदांना एक कोटी ३० लाख ५७ हजार ७३५, कवठेमहांकाळमधील ७० सोसायटीमधील आठ हजार ५६१ सभासदांना ९६ लाख तीन हजार ६२१, जतमधील ८२ सोसायटीमधील १४ हजार १४४ सभासदांना एक कोटी ७३ लाख २९ हजार ७२९, तासगावमधील ७८ सोसायटीच्या नऊ हजार ११६ सभासदांना एक कोटी २६ लाख दोन हजार ८६८, आटपाडीमधील ६९ सोसायटीच्या तीन हजार ३०८ सभासदांना ४६ लाख १५ हजार ५७१, खानापूर ५८ सोसायटीच्या चार हजार ३५ सभासदांना ४९ लाख ५२ हजार १३४, पलूसमधील ५० सोसायटीच्या चार हजार २६६ सभासदांना ६५ लाख ७४ हजार ६०८, कडेगाव तालुक्यातील ७० सोसायटीमधील तीन हजार ६६० सभासदांना ५६ लाख ५१ हजार २६७ रुपये परत दिले आहेत.