शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दरीबडचीत पिके धोक्यात

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

परतीच्या पावसाची पाठ

दरीबडची : परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके सुकू लागली आहेत. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पुरेशी ओल व कडक ऊन यामुळे पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झाली नाही. शेतकरी त्या ठिकाणी पाणी पाजू लागला आहे. पाऊस झाला नाही तर दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. त्याशिवाय करडई पाच हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर व मका ८०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात इतर गळीत धान्ये घेतली जातात.सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे. सकाळी दवबिंदू पडू लागले आहेत. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकरी पिकांना पाणी पाजू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले, बंधारे, विहिरींतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पांदीतील शेतजमिनीमध्ये आता ओपसा आला आहे. शेतकरी नांगरणे, कुळवणे, मशागत आदी कामे करणार आहे. त्याठिकाणी गहू, खपली, हरभरा पिकांची पेरणी केली जाणार आहे. सध्याच्या अनुकूल वातावरणामुळे पिकांची उगवण चांगली होणार आहे. (वार्ताहर)परतीच्या पावसाची पाठकडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे.