शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दरीबडचीत पिके धोक्यात

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

परतीच्या पावसाची पाठ

दरीबडची : परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके सुकू लागली आहेत. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पुरेशी ओल व कडक ऊन यामुळे पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झाली नाही. शेतकरी त्या ठिकाणी पाणी पाजू लागला आहे. पाऊस झाला नाही तर दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. त्याशिवाय करडई पाच हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर व मका ८०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात इतर गळीत धान्ये घेतली जातात.सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे. सकाळी दवबिंदू पडू लागले आहेत. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकरी पिकांना पाणी पाजू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले, बंधारे, विहिरींतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पांदीतील शेतजमिनीमध्ये आता ओपसा आला आहे. शेतकरी नांगरणे, कुळवणे, मशागत आदी कामे करणार आहे. त्याठिकाणी गहू, खपली, हरभरा पिकांची पेरणी केली जाणार आहे. सध्याच्या अनुकूल वातावरणामुळे पिकांची उगवण चांगली होणार आहे. (वार्ताहर)परतीच्या पावसाची पाठकडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे.