शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
3
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
4
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
7
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
8
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
9
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
10
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
11
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
12
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
13
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
14
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
15
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
17
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
19
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
20
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रक्ताचा दुष्काळ...

By admin | Updated: June 14, 2016 00:03 IST

रक्तदान लोकचळवळ होण्याची गरज : संकुचित मानसिकताही रक्ताच्या तुटवड्यास कारणीभूत असल्याचे चित्र

शरद जाधव--- सांगली --आजच्या आधुनिक जीवनात मी आणि माझे कुटुंब यात आपले गुरफटलेपण वाढत असतानाच, ‘दान’ ही संकल्पना हद्दपार होत चालली आहे. तसेच रक्तदान करणे शरीरास लाभदायक आहे का? यासह अनेक भ्रामक कल्पनांमुळे, सध्या रक्ताची गरज असतानाही, जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चिंताजनक चित्र आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सलग दुष्काळाचा सामना करावा लागत असताना, आता संकुचित मानसिकतेमुळे रक्ताचाही दुष्काळ असल्याचे म्हणावे लागत आहे.आजच्या आधुनिक युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या जागृतीमुळे या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. पण रक्तदानाबाबत असलेले गैरसमज रूग्णांना अडचणीचे ठरत आहेत. रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण तर वाचतातच, परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते. किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते, असे विज्ञान सांगत असले तरी, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यातील रक्ताच्या तुटवड्याचा आढावा घेतला असताना, सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ‘ए’, ‘बी’ पॉझीटिव्ह आणि निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच शेजारच्या कर्नाटकातूनही रक्ताची मागणी असल्याने शहरातील रक्तपेढ्यांवर ताण पडत आहे. सांगली, मिरजेत एकूण ११ रक्तपेढ्या आहेत. यात शासकीय रूग्णालय, वसंतदादा, शिरगावकर व सिध्दिविनायक या जुन्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने, ते शासकीय रूग्णालयाचा आधार घेतात. याठिकाणी केवळ ‘व्होल ह्युमन’ हे कोणतेही प्रक्रिया न केलेले रक्त उपलब्ध होते. अपघात व अन्य कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी त्यावेळी रुग्णालयाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करू शकत नाही. त्यासाठी आपले सामाजिक भान जपत रक्तदान चळवळ वाढविणे ही गरज बनली आहे.सध्याची रक्ताची उपलब्धता लक्षात घेतली, तर ती मागणीपेक्षा खूपच कमी आहे. ज्या रूग्णाला रक्ताची गरज आहे, त्याच्या नातेवाईकांनाच त्यासाठी धावपळ करावी लागते. सध्या रक्तदान शिबिरांचेही प्रमाण कमी झाले आहे, हे दुर्दैवी असून केवळ सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनीच नव्हे, तर सर्वांनीच यासाठी पुढाकार घेत रक्तदान चळवळ वाढविली पाहिजे. रक्तदानाचा एक निर्णय रुग्णाचे प्राण वाचवू शकतो, याचे भान प्रत्येक असायला हवे. -धनंजय भिसे, जनसंपर्क अधिकारी, भारती हॉस्पिटल रक्तपेढी, सांगली.