शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

द्राक्षबागा धोक्यात...

By admin | Updated: May 31, 2016 00:30 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात चित्र : पाणीटंचाईचे संकट

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीला पसंती दिल्यानंतर तालुक्यात हळूहळू द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले. हळूहळू शेतकरी निर्यातक्षम द्राक्षेही पिकवू लागला. त्याला युरोपात तसेच आखाती देशातही चांगला भाव मिळून मागणी वाढू लागली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष क्षेत्रही वाढले. पण गेल्या काही वर्षांपासून सतत कमी पडणाऱ्या पावसामुळे व हवामानाच्या लहरीपणामुळे या द्राक्ष बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.बागायत क्षेत्रही घटण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या दुष्काळ व सध्या पाणी टंचाईमुळे द्राक्षबागा करपू लागल्या आहेत. त्यातच हवामानाच्या हलरीपणाचा फटकाही द्राक्षबागेला बसत आहे. रोगांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असून, शेतकऱ्यांना हवामानाचा वेध घेत औषधे सोबत घेऊन बागेत थांबावे लागत आहे. दुष्काळामुळे टॅँकरने पाणी देऊन बागा जगविल्या जात आहेत. तसेच भरमसाठ रोजंदारी देऊन कामगार बागेत कामाला आणावे लागतात. १२ महिने २४ तास राबूनही द्राक्षाचे दर हे परप्रांतीय दलाल ठरवित असून, ते द्राक्षाला गोडीच नाही, रंग आला नाही, अशी विविध कारणे सांगून ते दर पाडत असतात. त्यामुळे महागडी बियाणे, खते, औषधे, टॅँकरने घातलेल्या पाण्याचा खर्च तसेच रोजंदारीवर होणारा खर्च यातून १०० टक्के नफा मिळेलच असे नाही. खर्च जाता पदरात काही पडेल, याची खात्रीही नाही.कमी पावसाने कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी टॅँकरने पाणी आणावे लागत असून, काही शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका खोदत आहेत. सगळीकडे कूपनलिका यंत्रांची घरघर ऐकू येत आहे. कूपनलिका खोदण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस थांबावे लागत आहे. परंतु ज्या बळिराजाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, अशांवर बागा सोडून देण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. (वार्ताहर) योजना : कागदावरतालुक्यातील काही भागात जलसिंचनाचे काम झाले आहे. सध्या म्हैसाळ योजनेत आवर्तनही चालू आहे. त्याचा काही भागाला लाभ होईल, परंतु तालुक्यातील बराच भाग अद्यापही सिंचन योजनेपासून वंचित आहे. तेथे ना म्हैसाळ योजना, ना टेंभू योजना. तेथील योजना या फक्त कागदावरच आहेत.