शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

द्राक्षबागा धोक्यात...

By admin | Updated: May 31, 2016 00:30 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात चित्र : पाणीटंचाईचे संकट

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीला पसंती दिल्यानंतर तालुक्यात हळूहळू द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले. हळूहळू शेतकरी निर्यातक्षम द्राक्षेही पिकवू लागला. त्याला युरोपात तसेच आखाती देशातही चांगला भाव मिळून मागणी वाढू लागली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष क्षेत्रही वाढले. पण गेल्या काही वर्षांपासून सतत कमी पडणाऱ्या पावसामुळे व हवामानाच्या लहरीपणामुळे या द्राक्ष बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.बागायत क्षेत्रही घटण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या दुष्काळ व सध्या पाणी टंचाईमुळे द्राक्षबागा करपू लागल्या आहेत. त्यातच हवामानाच्या हलरीपणाचा फटकाही द्राक्षबागेला बसत आहे. रोगांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असून, शेतकऱ्यांना हवामानाचा वेध घेत औषधे सोबत घेऊन बागेत थांबावे लागत आहे. दुष्काळामुळे टॅँकरने पाणी देऊन बागा जगविल्या जात आहेत. तसेच भरमसाठ रोजंदारी देऊन कामगार बागेत कामाला आणावे लागतात. १२ महिने २४ तास राबूनही द्राक्षाचे दर हे परप्रांतीय दलाल ठरवित असून, ते द्राक्षाला गोडीच नाही, रंग आला नाही, अशी विविध कारणे सांगून ते दर पाडत असतात. त्यामुळे महागडी बियाणे, खते, औषधे, टॅँकरने घातलेल्या पाण्याचा खर्च तसेच रोजंदारीवर होणारा खर्च यातून १०० टक्के नफा मिळेलच असे नाही. खर्च जाता पदरात काही पडेल, याची खात्रीही नाही.कमी पावसाने कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी टॅँकरने पाणी आणावे लागत असून, काही शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका खोदत आहेत. सगळीकडे कूपनलिका यंत्रांची घरघर ऐकू येत आहे. कूपनलिका खोदण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस थांबावे लागत आहे. परंतु ज्या बळिराजाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, अशांवर बागा सोडून देण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. (वार्ताहर) योजना : कागदावरतालुक्यातील काही भागात जलसिंचनाचे काम झाले आहे. सध्या म्हैसाळ योजनेत आवर्तनही चालू आहे. त्याचा काही भागाला लाभ होईल, परंतु तालुक्यातील बराच भाग अद्यापही सिंचन योजनेपासून वंचित आहे. तेथे ना म्हैसाळ योजना, ना टेंभू योजना. तेथील योजना या फक्त कागदावरच आहेत.