शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST

मुख्यालय सक्तीचे करा सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवक, सेविकांना आरोग्य केंद्राच्या मुख्यालयात राहण्याची सक्ती ...

मुख्यालय सक्तीचे करा

सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवक, सेविकांना आरोग्य केंद्राच्या मुख्यालयात राहण्याची सक्ती आहे. शिक्षक आणि जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याची सक्ती असूनही त्याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणे कधी हटणार?

सांगली : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. पण, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद कार्यालयातच अस्वच्छता

सांगली : जिल्हा परिषदेच्या मुख्य आणि नवीन इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे. मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून, त्यावर घाण, कचरा साठून असतो़. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़. विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र आहे.

बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला

करगणी : आटपाडी तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.

मंदिर परिसरात शुकशुकाट

तासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणपती मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावली आहे. आता पुन्हा मंदिर बंद ठेवल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंदिर बंद असल्याने या परिसरातील व्यवसायही थंडावले आहेत.

तासगाव-भिवघाट रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली

मांजर्डे : तासगाव ते भिवघाट रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

संचारबंदीने विवाह सोहळ्याच्या खरेदीला अडचणी

सांगली : राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, ज्यांच्या घरांमध्ये पुढील महिन्यात शुभकार्य आहे. त्यातही लग्न सोहळा आहे, अशा कुटुंबीयांना कपडे, रूखवताचे सामान, सोन्याचे दागिने, भेट वस्तूंसाठी फर्निचरची दुकाने बंद असल्याने शुभकार्याला अडथळाच जाणवत आहे.