शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
2
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
3
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
4
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
5
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
6
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
7
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
8
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
9
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
10
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
11
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
12
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
13
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
14
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
15
Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
16
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
17
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
18
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
19
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
20
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...

आंधळीत येरळेवरील बंधाऱ्यामुळे शेतीचा पाणी प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

सावंतपूर : आंधळी (ता. पलुस) येथे येरळा नदीवर १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील ...

सावंतपूर : आंधळी (ता. पलुस) येथे येरळा नदीवर १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी केले.

आंधळी येथे जलसंपदा विभागांतर्गत स्थानिक स्तर विभागाच्या माध्यमातून १ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड, तहसीलदार निवास ढाणे उपस्थित होते. डाॅ. कदम म्हणाले, येरळा नदीवर बंधाऱ्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. डाॅ. पतंगराव कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या विशेष प्रयत्नातून जलसंपदा खात्यातून १ कोटीचा निधी मंजूर झाला होता. या बंधाऱ्यामुळे आंधळी, निंबळक, वाझर, मोराळे व परिसरातील शेतीला पाण्याची उपलब्धता झाली आहे. परिसरात ऊस, द्राक्षे, भाजीपाला व अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतीचे उत्पन्न वाढेल. यापुढेही विविध प्रश्न, विकास कामे यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गोसावी, आंधळीचे सरपंच आमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, बबन पाटील, प्रकाश माने, अशोक कदम, विजय पवार, बजरंग जाधव, ग्रामसेविका सुरेखा पवार उपस्थित होते.