फोटो ओळ : म्हैसाळ योजनेचे आवर्तन बुधवारी सुरु करण्यात आले. यावेळी मनोज शिंदे-म्हैसाळकर, मिलिंद नाईक, सूर्यकांत नलवडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : शेतीसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाल्याने बुधवारी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून योजना कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे उपस्थित होते.
सध्या उन्हाची दाहकता वाढत असल्याने शेतीला पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याकडे केली होती. शिंदे यांनी ही समस्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी ‘म्हैसाळ’चे पंप सुरू झाले.
यावेळी बाळासाहेब होनमोरे, तानाजी दळवी, शिवाजीराव महाडिक, वास्कर शिंदे, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, सुरेश कोळेकर, महावीर खोत, पृथ्वीराज सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कोट
सध्या उन्हाळा वाढत असल्याने शेतातील विहीर व कुपनलिकांच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली होती. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. त्यानुसार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले.
- मनोज शिंदे-म्हैसाळकर
अध्यक्ष, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना