शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कर्तृत्वसंपन्न नेतृत्वाचा सुसंस्कृत वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे सुपुत्र, भारती विद्यापीठाचे कुशल प्रशासक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शक्तिशाली ...

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे सुपुत्र, भारती विद्यापीठाचे कुशल प्रशासक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शक्तिशाली व कुशल संघटक, युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे युवा नेतृत्व, एक आक्रमक आंदोलक, पदयात्रा काढून दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा जाणून घेणारे युवा नेते अशा अनेक भूमिकांमध्ये आपण डॉ. विश्वजित कदम यांची वाटचाल पाहत आहोत. आता प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, पलूस कडेगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, राज्याचे सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा आदी खात्यांचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा भक्कमपणे चालवत आहेत. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त.

राज्याच्या मंत्रिमंडळातील एक तरुण आणि वेगाने समाजहिताची कामं करणारे मंत्री म्हणून विश्वजित कदम पुढे येत आहेत. विश्वजित कदम यांच्यात

राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाची क्षमता असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि दिग्गज नेत्यांनीही सांगितले. विश्वजित यांनी युवक चळवळीच नेतृत्व केलं आहे, राहुल गांधींचे खंदे शिलेदार म्हणून काम केलं आहे. युवक काँग्रेस आणि पदयात्रेतले विश्वजित कदम यांचे परिश्रम पाहून राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्याचं ठरवलं होतं. कारण ती गुणवत्ता आणि परिश्रम घेण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे. हे राहुल गांधी यांना माहिती आहे. मात्र, विश्वजित कदम

यांनी स्वतः राहुल गांधी यांना भेटून

मला माझ्या मतदारसंघात, पलूस कडेगावच्या मातीतील जनतेची सेवा करायची आहे. राज्यात काम करायचे आहे, असे आवर्जून सांगितले होते. ९ मार्च २०१८ रोजी आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचं निधन झालं. यामुळे रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम पलूस कडेगाव मतदारसंघातून बिनविरोध आमदार झाले, त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा महाविकास आघाडीची सत्ता आली. मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना

राजमंत्री म्हणून संधी मिळाली. जी मिळेल ती जबाबदारी समर्थपणे पार पडण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी तो वारसा विश्वजित कदम यांना दिला आहे. यामुळे डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा खांबीरपणे चालवत त्यांची वैचारिक, राजकीय आणि कार्यकर्तृत्वाची परंपरा पुढे नेण्याचं काम विश्वजित कदम समर्थपणे करत आहेत.

वडिलांप्रमाणेच त्यांच्याकडे विधायक व व्यापक दृष्टी आहे, जनतेची मनं जिंकून घेणारा स्वभाव आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातली सहजता, विनम्रता, सुसंस्कृतपणा जनतेला भावणारा आहे.

विश्वजित कदम हे राज्याच्या मंत्रिमंडळातील तरुण मंत्री आहेत. सर्वात सुपरफास्ट मंत्री म्हणून विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जातं. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी स्थापन केलेली भारती विद्यापीठ ही संस्था देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या कारभाराचा व्याप

ते गेल्या अनेक वर्षांपासून समर्थपणे सांभाळत आहेत. राहुल गांधींना अभिप्रेत असलेलं सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम मंत्री म्हणून सक्षमपणे करीत आहेतच, शिवाय काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून

पक्ष संघटनाचे कामही सातत्याने करीत आहेत. नेतृत्व एका दिवसात

घडत नाही, ते घडवावं लागतं. ते घडविणारी जनता पलूस कडेगावमध्ये आहे. यामुळे विश्वजित कदम आज ताकदीने मंत्रिमंडळात काम करीत आहेत.

मागील वर्षापासून राज्यमंत्री

म्हणून कार्यरत असलेल्या विश्वजित कदम यांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला आहे. एखाद्या राजकीय नेत्याने संकटकाळात जनतेला मदत कशी करावी, धीर कसा द्यावा याचं आदर्श उदाहरण डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांच्या कामातून

घालून दिले आहे.

महापुराच्या संकटकाळात विश्वजित कदम यांनी कृष्णाकाठच्या लोकांना केलेली मदत, कोरोनाच्या संकटात त्यांनी व्यक्तिगत केलेली मदत आणि भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेली रुग्णसेवा, लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जनतेशी संवाद साधून दिलेला धीर, हे सगळं संकटकाळात एखाद्या नेत्यानं जनतेला मदत कशी करावी, याचं आदर्श उदाहरण आहे.

राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कोरोनाविरोधातल्या लढाईत विश्वजित कदम यांनी प्रशासनातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबत पलूस कडेगाव मतदारसंघात गावोगावी

जावून कंटेन्मेंट झोनला भेटी दिल्या. याशिवाय राज्यभरात विविध ठिकाणी जाऊन लागेल ती मदत व सहकार्य केले आहे. राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना सर्वसमावेशक विकास करणं. राज्यातील जनतेच्या भल्याचे अधिकाधिक निर्णय घेणं, शेतकऱ्यांचे हित जपणं व राज्यावरील संकटांचा निर्धारानं मुकाबला करणं, हेच मुख्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विश्वजित कदम कार्यरत आहेत.

त्यांच्या अंगी असलेला समजूतदारपणा, सुसंस्कृत आणि सोज्वळ स्वभाव सामान्य जनतेला भावतो. काँग्रेसला आणि पलूस कडेगाव मतदारसंघाला डॉ. विश्वजित कदम यांच्या रूपानं एक सक्षम आणि कुशल नेतृत्व पलूस कडेगाव मतदारसंघाला लाभलं आहे. त्यांची कार्यशैली पाहताच डॉ. पतंगराव कदम साहेब यांची प्रकर्षाने आठवण होते. राज्याचे मंत्री म्हणून विश्वजित कदम हे सक्षमपणे जबाबदारी सांभाळत पलूस कडेगाव मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर सातत्याने अग्रेसर ठेवतील, असा विश्वास आहे. विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

समर्थपणे सांभाळली आहे. आता प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं नेतृत्व भक्कम आहे, त्यामुळे काँग्रेसमधील शक्तिशाली संघटक म्हणून त्यांची राज्यभरात चर्चा आहे.

इतकेच नव्हे तर त्यांची वैचारिक बैठकही पक्की आहे. कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत. तोल जराही ढळू देत नाहीत. वस्तुस्थिती समजून घेऊन, परिस्थितीचा समतोल विचार, सखोल अभ्यास करून निर्णय घेतात. त्या निर्णयात दृढता आहे. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तो योग्य असल्याचे पटवून देण्याची क्षमता, कौशल्य त्यांच्याकडे आहे.

डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा, भारती विद्यापीठ, भारती बँक, भारती हॉस्पिटल, सोनहीरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर व कृष्णा वेरळा सहकारी सूतगिरणी असे सहकारातील संस्थांचे जाळे, काँग्रेसचे कार्याध्यक्षपद,

सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा आदी खात्यांचे राज्यमंत्री इतकी ताकद जवळ असूनही विश्वजित कदम यांचा विनम्रपणा लोकांना भावणारा आहे. हीच त्यांची मोठी ताकद आहे. चांगलं काम करणारा एक तरुण मंत्री म्हणून नवी ओळख

निर्माण झालेल्या व राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यरत असलेल्या विश्वजित कदम यांनी यापूर्वीच

यूथ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चांगली

बांधणी केली आहे. राज्य मंत्रिमंडळातील

तरुण मंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून तमाम महाराष्ट्र पाहतोय.

लेखक : प्रताप महाडिक, कडेगाव