शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोगलगार्इंकडून पिकांचे नुकसान

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

मिरज पूर्वमधील स्थिती : शेतकरी वर्गात चिंता

टाकळी : टाकळीसह परिसरात शांखी गोगलगाईचा उपद्रव वाढला आहे. ओढे-नाले वाहत असल्याने परिसरात दलदलीचे प्रमाण वाढले आहे. हजारोच्या संख्येने गोगलगाई दलदलीतून बाहेर पडून शेतीक्षेत्रात वावरत आहेत. ओढ्या-नाल्यांच्या कडेला असणाऱ्या शेतातील विविध पिकांचे नुकसान गोगलगार्इंकडून होत असल्याने विविध समस्यांत फसलेले शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. मिरज पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने ओढे-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पिकेही चांगली वाढलेली आहेत. मात्र दलदलीचे प्रमाण वाढल्याने गोगलगार्इंचे दर्शन मोठ्याप्रमाणात होत आहे. या गोगलगार्इंकडून टाकळी, बोलवाड, गणेशनगर, मल्लेवाडी, एरंडोली या भागामध्ये द्राक्ष, दोडका, कारली, वांगी, ढबू, फ्लॉअर, शेंगा, मिरची या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले जात आहे. गोगलगार्इंकडून पिकांच्या सालीसह फळ खाल्ले जात असल्याने संपूर्ण झाड वाळत आहे. द्राक्षपिकाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. गोगलगार्इंकडून द्राक्षवेलीवरील काडीची साल खाल्ली गेल्याने फळछाटणीला आलेल्या काड्या वाळत आहेत. पाच ते सहा फूट उंच असणाऱ्या द्राक्षवेलींवरही गोगलगार्इंचा वावर आहे. द्राक्षबागेवर मारण्यात येणाऱ्या औषधांचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सहा इंचापर्यंत असणाऱ्या गोगलगार्इंवर मोठे शंख आहेत. ओढ्या-नाल्यांच्या परिसरात गोगलगार्इंची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. औषध मारल्यास थोड्यावेळासाठी त्या शंकात लपून बसतात व परत बाहेर येतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. त्यासाठी घरगुती उपाय म्हणून तंबाखूचे धुसर शेतकऱ्यांकडून शेतात टाकले जात आहे. त्यातून काही प्रमाणात गोगलगाई कमी होत असल्या तरी दुसऱ्यादिवशी हजारोंच्या संख्येने गोगलगाई शेतात फिरत असताना दिसतात. काही शेतकरी सकाळी मजूर लावून गोगलगाई वेचून पुरून टाकत आहेत. तरीही गोगलगार्इंची संख्या कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)गोगलगार्इंकडून द्राक्ष फळछाटणीसाठी तयार करण्यात आलेल्या काड्यांच्या साली खाल्ल्या जात आहेत. त्यामुळे गोगलगार्इंचा ज्या क्षेत्रात वावर आहे, तेथे द्राक्ष उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे द्राक्ष शेतकरी श्रीकांत कौलगे यांनी सांगितले.