शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर संकट; कर्जफेडही अडचणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:06 IST

कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीचा फटका; छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबलीविहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे

गजानन पाटील ।संख : कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत.

यावर्षी द्राक्ष छाटणीची कामे पाण्याअभावी होणार नसल्याने द्राक्षबागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागाच काढून टाकाव्या लागणार असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. द्राक्षबागांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे.

जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्षजातीच्या बागा आहेत.

विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. उमदी, बिळूर, सिद्धनाथ, तिकोंडी, भिवर्गी, अंकलगी, जालिहाळ खुर्द, मुचंडी, डफळापूर, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्येवबोबलाद, हळ्ळी, बेळोंडगी, करजगी आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.पण यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी मे-जून महिन्यातच कोरडे पडले होते. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटापर्यंत खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील पाण्याची पातळी २१४ मीटर खाली गेली आहे. तालुक्यात यावर्षी अत्यल्प सरासरी २०० मिलिमीटर इतकाच पाऊस पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. १४ गावे व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

कूपनलिका खोदली तरीही पाणी लागत नाही. पूर्व भागातील दरीबडची, संख, उमदी, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, सिद्धनाथ परिसरात पाऊस कमी झालेला आहे. द्राक्षबागायतदारांनी आतापर्यंत टॅँकरने पाणी घालून काड्या व बागा जगविल्या आहेत.

पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटण्या रखडलेल्या आहेत. तर काही शेतकºयांनी अवकाळी पावसाच्या भरवशावर छाटण्या घेतलेल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून बागांना पाणी मिळणे मुश्किल होणार असल्याने द्राक्षबागा वाळणार आहेत. टॅँकर भरायलाही पाणी मिळणार नसल्याने बागा काढून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. शेतकºयांच्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.बेदाणा उत्पादन : घटणारपाण्याअभावी द्राक्षबागांची छाटणी झाली नसल्याने द्राक्ष उत्पादन कमी होणार आहे. परिणामी बेदाणा उत्पादनात घट होणार आहे. बेदाणा निर्मितीमुळे मजुरांना काम मिळत होते. पण आता मजुरांना कमी रोजगार मिळणार आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकरी विलासराव शिंदे म्हणाले, पाणी नसल्याने छाटण्या रखडलेल्या आहेत. जानेवारीनंतर पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी यातून वर येणार नाही. प्रपंच चालविणेही अवघड होणार आहे. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- सोमनिंग मौलापुरे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली