शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर संकट; कर्जफेडही अडचणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:06 IST

कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीचा फटका; छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबलीविहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे

गजानन पाटील ।संख : कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत.

यावर्षी द्राक्ष छाटणीची कामे पाण्याअभावी होणार नसल्याने द्राक्षबागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी द्राक्षबागाच काढून टाकाव्या लागणार असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. द्राक्षबागांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे.

जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्षजातीच्या बागा आहेत.

विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. उमदी, बिळूर, सिद्धनाथ, तिकोंडी, भिवर्गी, अंकलगी, जालिहाळ खुर्द, मुचंडी, डफळापूर, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्येवबोबलाद, हळ्ळी, बेळोंडगी, करजगी आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.पण यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी मे-जून महिन्यातच कोरडे पडले होते. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटापर्यंत खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील पाण्याची पातळी २१४ मीटर खाली गेली आहे. तालुक्यात यावर्षी अत्यल्प सरासरी २०० मिलिमीटर इतकाच पाऊस पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. १४ गावे व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

कूपनलिका खोदली तरीही पाणी लागत नाही. पूर्व भागातील दरीबडची, संख, उमदी, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, सिद्धनाथ परिसरात पाऊस कमी झालेला आहे. द्राक्षबागायतदारांनी आतापर्यंत टॅँकरने पाणी घालून काड्या व बागा जगविल्या आहेत.

पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आॅक्टोबर महिन्यातील ३० टक्के छाटण्या रखडलेल्या आहेत. तर काही शेतकºयांनी अवकाळी पावसाच्या भरवशावर छाटण्या घेतलेल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून बागांना पाणी मिळणे मुश्किल होणार असल्याने द्राक्षबागा वाळणार आहेत. टॅँकर भरायलाही पाणी मिळणार नसल्याने बागा काढून टाकण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. शेतकºयांच्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.बेदाणा उत्पादन : घटणारपाण्याअभावी द्राक्षबागांची छाटणी झाली नसल्याने द्राक्ष उत्पादन कमी होणार आहे. परिणामी बेदाणा उत्पादनात घट होणार आहे. बेदाणा निर्मितीमुळे मजुरांना काम मिळत होते. पण आता मजुरांना कमी रोजगार मिळणार आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकरी विलासराव शिंदे म्हणाले, पाणी नसल्याने छाटण्या रखडलेल्या आहेत. जानेवारीनंतर पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी यातून वर येणार नाही. प्रपंच चालविणेही अवघड होणार आहे. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- सोमनिंग मौलापुरे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली