शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तासगावमधील आंदोलकांवर फौजदारीचा जिल्हा परिषदेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

सांगली : तासगाव बचत भवनातील गाळ्यांसंदर्भात प्रशासनाची कारवाई योग्यच आहे. आंदोलकांनी तेथील महिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर कृत्य सुरू ...

सांगली : तासगाव बचत भवनातील गाळ्यांसंदर्भात प्रशासनाची कारवाई योग्यच आहे. आंदोलकांनी तेथील महिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर कृत्य सुरू केल्याचा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

तासगाव बचत भवनातील गाळ्यांच्या वापरावरून प्रशासन आणि गाळेधारकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाने काही गाळे सील केले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. डुडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, २८ गाळे भाडेकराराने दिले आहेत. त्यातील काहींनी भाडेकरार केलेले नाहीत. काहींनी बेकायदेशीररीत्या पोटभाडेकरू ठेवले आहेत, तर काहींनी नियमबाह्य फेरफार केले आहेत. तशा तक्रारी प्रशासनाकडे आल्याने ६ जुलै रोजी गाळ्यांची तपासणी केली. अमोल पाटील यांना गाळा मंजूर होऊनही करारनाम्यास टाळाटाळ केल्याचे आढळले. विनापरवाना पोटभाडेकरू ठेवून चहाचे हॉटेल सुरू केले. पोटमाळ्यांची भिंत पाडून दोन पोटमाळे एकत्र करून वापर सुरू केल्याचे दिसले. गाळ्याचे १ लाख ४४ हजार रुपये भाडे थकवून जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान केले आहे.

डुडी यांनी सांगितले की, रवींद्र नलवडे या गाळेधारकानेही बेकायदेशीर फेरफार करून दोन पोटमाळे एकत्र जोडले आहेत. विठ्ठल कदम यांनी जुलैअखेर ७५ हजार रुपये भाडे थकीत ठेवले असून, सव्वादोन लाख रुपयांची अनामतही भरलेली नाही. या सर्वांना वारंवार नोटिसा काढण्यात आल्या होत्या, त्यानंतरच गाळे सील करण्यात आले; पण त्यांनी बेकायदा जमाव जमवून व आमरण उपोषणाचा धाक दाखवून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

चाैकट

महिला अधिकाऱ्यांवर दबावतंत्र

डुडी म्हणाले की, तासगाव पंचायत समितीत सभापती, गटविकास अधिकारी व उपअभियंता पदावर महिला काम करीत आहेत. आंदोलकांकडून त्यांच्यावर अरेरावी व दमदाटी करून, दबाव टाकून बेकायदेशीर कामे करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिला सक्षमपणे काम करीत आहेत. आंदोलकांकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून व आर्थिक हानी पोहोचवून प्रशासनाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीची प्रक्रिया सुरू केली आहे.