शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मिरजेतून आघाडीला सुरुंग

By admin | Updated: April 29, 2017 00:06 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध रणनीती : प्रभाग सभापती निवडीनिमित्त संघर्ष

सांगली : महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समिती सभापती निवडीत आघाडी केली खरी, पण ही आघाडी मिरजकरांच्या पचनी पडलेली नाही. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आघाडीच्या राजकारणाला सुरूंग लावत सवतासुभा मांडला आहे. त्याचा प्रयत्य सभापती निवडीच्या निमित्ताने येत असून शनिवारी होणाऱ्या निवडीवेळी प्रभाग चारचे सभापतीपद कोणाकडे जाणार? याचीच उत्सुकता लागली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहराची महापालिका झाली तरी मिरजकरांनी नेहमीच आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये महापालिकेच्या स्थापनेपासून इद्रिस नायकवडी गटाचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला अनेकदा आव्हानही दिले गेले. पण अल्पमतात असतानाही नायकवडी यांनी विरोधकांवर मात केली होती. महापालिकेची सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होत असल्याने यंदा प्रभाग सभापती निवडीलाही महत्व प्राप्त झाले आहे. गतवर्षी सभापतीसाठी घरातून बोलावून उमेदवारी देण्यात आली. यंदा मात्र चारही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यात सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमीलन झाल्याने या निवडी बिनविरोध होतील, असा अंदाजही होता. सांगलीतील प्रभाग एकमध्ये पांडुरंग भिसे व वंदना कदम या दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली तर त्याबदल्यात प्रभाग दोनमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला हात दिला. या प्रभागात राष्ट्रवादीच्या अंजना कुंडले व स्वाभिमानीच्या अश्विनी खंडागळे यांचे अर्ज आहेत. स्वाभिमानीचे संख्याबळ कमी असल्याने कुंडले यांचा विजय निश्चित आहे. प्रभाग समिती तीन काँग्रेसला सोडण्यात आली असली तरी राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या गुलजार पेंढारी व राष्ट्रवादीच्या स्नेहा औंधकर यांचे अर्ज आहेत. औंधकर या माजी सभापती आहेत. या तीन प्रभागाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फारशी चिंता नाही. पण मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या प्रभागावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी कागदोपत्रीच आहे. इद्रिस नायकवडी गटाचाच उमेदवार आजअखेर सभापती झाला आहे. यापूर्वी या गटाच्या मालन हुलवान, हसिना नायकवडी यांनी सभापती पदाची सूत्रे सांभाळली आहेत. आता आघाडीच्या राजकारणात या प्रभागात काँग्रेसने अश्विनी कांबळे यांना उमेदवारी दिली. पण त्याची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याचे सांगत नायकवडी गटातून शुभांगी देवमाने व शिवाजी दुर्वे यांनी अर्ज दाखल केले आहेत. पक्षीय संख्याबळाला या प्रभागात फारसे महत्व नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी आघाडीलाच सुरूंग लावला आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराऐवजी इतर उमेदवारांसाठी जुळवाजुळव गतिमान झाली आहे. मिरजेतील सर्वच नेते स्वयंभू असल्याने दोन ते तीन गट एकत्र येऊन राजकारणाची दिशा ठरवित असतात. हाच अनुभव आता प्रभाग सभापती निवडीच्या निमित्ताने येत आहे. या निवडीने आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)नायकवडी : संघर्ष समिती की भाजप?माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी कधी मिरज संघर्ष समिती तर कधी राष्ट्रवादी, तर कधी विकास महाआघाडीतून महापालिकेत प्रवेश केला. आता काँग्रेसच्या चिन्हावर त्यांच्या घरातील तिघेजण नगरसेवक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे नायकवडी व त्यांच्या पाठीमागे जाणारे नगरसेवक मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार, की भाजपमध्ये प्रवेश करणार, याची चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता कमी असली तरी राजकीय समझोता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.