शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

मिरजेतून आघाडीला सुरुंग

By admin | Updated: April 29, 2017 00:06 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध रणनीती : प्रभाग सभापती निवडीनिमित्त संघर्ष

सांगली : महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समिती सभापती निवडीत आघाडी केली खरी, पण ही आघाडी मिरजकरांच्या पचनी पडलेली नाही. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आघाडीच्या राजकारणाला सुरूंग लावत सवतासुभा मांडला आहे. त्याचा प्रयत्य सभापती निवडीच्या निमित्ताने येत असून शनिवारी होणाऱ्या निवडीवेळी प्रभाग चारचे सभापतीपद कोणाकडे जाणार? याचीच उत्सुकता लागली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहराची महापालिका झाली तरी मिरजकरांनी नेहमीच आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये महापालिकेच्या स्थापनेपासून इद्रिस नायकवडी गटाचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला अनेकदा आव्हानही दिले गेले. पण अल्पमतात असतानाही नायकवडी यांनी विरोधकांवर मात केली होती. महापालिकेची सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होत असल्याने यंदा प्रभाग सभापती निवडीलाही महत्व प्राप्त झाले आहे. गतवर्षी सभापतीसाठी घरातून बोलावून उमेदवारी देण्यात आली. यंदा मात्र चारही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यात सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमीलन झाल्याने या निवडी बिनविरोध होतील, असा अंदाजही होता. सांगलीतील प्रभाग एकमध्ये पांडुरंग भिसे व वंदना कदम या दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली तर त्याबदल्यात प्रभाग दोनमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला हात दिला. या प्रभागात राष्ट्रवादीच्या अंजना कुंडले व स्वाभिमानीच्या अश्विनी खंडागळे यांचे अर्ज आहेत. स्वाभिमानीचे संख्याबळ कमी असल्याने कुंडले यांचा विजय निश्चित आहे. प्रभाग समिती तीन काँग्रेसला सोडण्यात आली असली तरी राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या गुलजार पेंढारी व राष्ट्रवादीच्या स्नेहा औंधकर यांचे अर्ज आहेत. औंधकर या माजी सभापती आहेत. या तीन प्रभागाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फारशी चिंता नाही. पण मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या प्रभागावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी कागदोपत्रीच आहे. इद्रिस नायकवडी गटाचाच उमेदवार आजअखेर सभापती झाला आहे. यापूर्वी या गटाच्या मालन हुलवान, हसिना नायकवडी यांनी सभापती पदाची सूत्रे सांभाळली आहेत. आता आघाडीच्या राजकारणात या प्रभागात काँग्रेसने अश्विनी कांबळे यांना उमेदवारी दिली. पण त्याची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याचे सांगत नायकवडी गटातून शुभांगी देवमाने व शिवाजी दुर्वे यांनी अर्ज दाखल केले आहेत. पक्षीय संख्याबळाला या प्रभागात फारसे महत्व नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी आघाडीलाच सुरूंग लावला आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराऐवजी इतर उमेदवारांसाठी जुळवाजुळव गतिमान झाली आहे. मिरजेतील सर्वच नेते स्वयंभू असल्याने दोन ते तीन गट एकत्र येऊन राजकारणाची दिशा ठरवित असतात. हाच अनुभव आता प्रभाग सभापती निवडीच्या निमित्ताने येत आहे. या निवडीने आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)नायकवडी : संघर्ष समिती की भाजप?माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी कधी मिरज संघर्ष समिती तर कधी राष्ट्रवादी, तर कधी विकास महाआघाडीतून महापालिकेत प्रवेश केला. आता काँग्रेसच्या चिन्हावर त्यांच्या घरातील तिघेजण नगरसेवक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे नायकवडी व त्यांच्या पाठीमागे जाणारे नगरसेवक मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार, की भाजपमध्ये प्रवेश करणार, याची चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता कमी असली तरी राजकीय समझोता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.