शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शंभराव्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील ...

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षानंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील संमेलनाची शक्यता नाही. नाट्यपंढरीतील रसिकांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

नाट्य परिषदेच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत नाट्यसंमेलन रद्द करण्यावर एकमत झाले होते; पण कोरोनाची पहिली लाट ओसरू लागल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. गेल्यावर्षी ७ मार्चला सांगलीत उद्घाटन आणि त्यानंतर राज्यभरात १० ठिकाणी संमेलने अशी रूपरेषा आखण्यात आली होती. तंजावर, सांगली. कोल्हापूर असा प्रवास करीत मुंबईत समाप्तीचे नियोजन होते; पण १४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने रंगाचा बेरंग झाला, तो अजूनही पूर्ववत झालेला नाही. संमेलनासाठी शासनाने अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली आहे; पण कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर पडलेला भार पाहता हा निधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.

मार्चपासूनचे सर्व कार्यक्रम स्थगित झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत तशीच स्थिती राहिली. दिवाळीत नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या बैठकीत संमेलन तूर्त स्थगित करण्यावर सदस्यांचे एकमत झाले. लॉकडाऊन संपून नाट्य प्रवाह पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर विचार व्हावा, असे सुचविण्यात आले. तशी स्थिती दीड वर्षानंतरही निर्माण झालेली नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेने परवानगी मिळाली होती, त्यावेळीही संमेलनाच्या संकल्पनेने उचल खाल्ली; पण पुन्हा दुसरी लाट सुरू झाल्याने ती गुंडाळून ठेवावी लागली.

सांगलीत यापूर्वी पाच नाट्यसंमेलने झाली आहेत; पण १०० व्या संमेलनाची साऱ्यांनाच उत्सुकता होती. जिल्ह्यातील नाट्य परिषदांच्या सर्व शाखांचा त्यात सक्रिय सहभाग होता.

चौकट

साडेनव्याण्णववे संमेलन झालेदेखील!

१०० वे नाट्यसंमेलन प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नसल्याने काही ज्येष्ठ रंगकर्मींनी मुंबईत साडेनव्याण्णववे संमेलन उरकून घेतले. मुलुंडमध्ये मर्यादित संख्येने कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला. मात्र, त्यानंतरही १०० व्या संमेलनाची तिसरी घंटा वाजलीच नाही.

कोट

सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतरच १०० वे नाट्यसंमेलन होईल. भविष्यात आता कधीही संमेलन झाले तरी ती शंभरावेच असेल, त्यामुळे ते उत्सवी पद्धतीने व राज्यभरात साजरे केले जाईल. तूर्त वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

- मुकुंद पटवर्धन, नाट्य परिषद, सांगली.