शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लगीनघरासह मंगल कार्यालयवाले धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST

ओळ : इस्लामपूर येथे चार ते पाच हजार क्षमता असलेल्या सर्जेराव यादव यांच्या मंगल कार्यालयात फक्त पन्नासच्या आसपासच पाहुणे ...

ओळ : इस्लामपूर येथे चार ते पाच हजार क्षमता असलेल्या सर्जेराव यादव यांच्या मंगल कार्यालयात फक्त पन्नासच्या आसपासच पाहुणे उपस्थित होते.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : मागील वर्षातील कोरोनाच्या आर्थिक फटक्यातून अद्याप सावरत नाही, तोपर्यंत लग्नकार्यालयांसह लगीनघरही नव्या वर्षातील कोरोना संकटाने धास्तावले आहे. लॉकडाऊनच्या भीतीसह मयार्दीत वऱ्हाडींसह मंगलकार्य आटोपते घेण्याच्या अटीमुळे त्यांची तारांबळ उडाली आहे.

राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू वाढत आहे. २०१९-२०मध्ये कोरोनाच्या संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका उद्योगांसह समाजातील सर्व घटकांना बसला आहे. आता २०२१मध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ज्याच्या घरात लग्नकार्य आहे तो आणि कार्यालयवाले नियमांचे पालन करूनच आपले कार्य सिद्धीस नेत आहेत.

ऑक्टोबर २०२०च्या दरम्यान कोरोनाचा कहर ओसरला होता. देशासह राज्यात असलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील उद्योग रूळावर येऊ लागले. दळण-वळणाला गती आली. काही नियम पाळून कार्यालये, हॉटेल आदी व्यवसाय रुळावर येऊ लागले. जानेवारी २०२१चा पूर्ण महिन्यात सर्व काही सुरळीत झाल्याचे चित्र तयार झाले होते.

फेब्रुवारी २०२१च्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. आता मार्च २०२१च्या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शासनाने काही व्यवसायावर निर्बंध घातले. यामध्ये सभा, लग्नसमारंभ, आंदोलने आदींचा समावेश आहे. लग्नसमारंभात ५० लोकांनाच संमती देण्यात आली. याचे नियम लग्नमालकासह कार्यालय यांनीही पाळावेत, असा स्पष्ट आदेश असल्याने पुन्हा कोरोनाच्या विळख्यात आणि लॉकडाऊनमध्ये सापडू नये यासाठीच विशेषत: जनजागृती होत आहे.

चौकट

सर्जेराव यादव यांनी घेतली दक्षता

उद्योजक सर्जेराव यादव यांची कन्या डॉ. सुरभि हिचा विवाह त्यांनी स्वत:च्या मंगल कार्यालयात पार पडला. यादव यांनी सर्व नियमांचे पालन आणि नियोजन करून समारंभास ५०हून अधिक पाहुणे असू नयेत, याची दक्षता घेतली आणि लग्नसमारंभ पार पाडला. हाच आदर्श इतरांनी घ्यावा. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.