शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शहरात कोरोना वाढतोय चोरपावलांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहता सांगली शहर पुन्हा धोकादायक वळणावर आहे. त्यात नागरिकांनी नियमांना हरताळ फासला असून गर्दीच्या ठिकाणी कुठलेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. नागरिकांची हीच बेफिकिरी अनेकांच्या जीवावर उठण्याची भीती आहे.

महापालिका क्षेत्रात गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातही मिरजेपेक्षा सांगली शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. चाचणी करून घेणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. अनेकांनी खासगी लॅबमध्ये चाचण्या केल्या आहेत. त्याचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर खासगी डाॅक्टरांकडून उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या कागदावर कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात सांगली शहरात धोका वाढल्याचे चित्र आहे. यातच काही उत्साही महाभाग मात्र हा धोका ओळखायला तयार नाहीत. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता. रुग्णांना बेडही मिळत नव्हते. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास हीच स्थिती पुन्हा येण्याची भीतीही वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सध्या शहरातील आठवडे बाजार हाउसफुल्ल आहेत. अनेक विक्रेते विनामास्कच व्यवसाय करतात. ग्राहक म्हणून बाजारात आलेला नागरिकही योग्य ती खबरदारी घेताना दिसत नाही. रस्त्यावर दुचाकीस्वार विनामास्क फिरत आहेत. गतवर्षी नागरिकांनी कोरोनाशी मुकाबला करताना खबरदारी घेतली होती. पण आता कुणीच फारसे गंभीर दिसत नाही. मुख्य बाजारपेठा, हाॅटेल्स, क्रीडांगणे अशा विविध ठिकाणी कुठल्याच नियमांचे पालन होत नाही. नागरिकांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ही वृत्ती कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

चौकट

नियमांना हरताळ

हाॅटेल, दुकाने, बसस्थानक, भाजीपाला व फळ बाजारासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली निश्चित केली आहे. पण आता या घटकांनी नियमांना तिलांजली दिली आहे. या सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेक जण तोंडाला मास्कही वापरत नाहीत. सॅनिटायझरची सोयही अनेक ठिकाणी नाही. प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातूनही अनेक जण अद्याप शहाणे झालेले नाहीत.