शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘कृष्णा’च्या निकालावर उलट-सुलट चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST

इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या मतदानानंतर तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे जास्त मतदान ...

इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या मतदानानंतर तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे जास्त मतदान असलेल्या गावांतील उमेदवारांनी आपल्या गावातील इतर उमेदवारांना सावरून घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल निकाल लागेल का, याबाबत साशंकता आहे.

मंगळवार, दि. २९ रोजी मतदानावेळी सर्व केंद्रांवर खेळीमेळीचे वातावरण होते. निवडणुकीत तिन्ही पॅनेलचे एकूण ६३ आणि ३ अपक्ष असे ६६ उमेदवार आहेत. नेर्ले, तांबवे, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, देवराष्ट्रे आणि इस्लामपूर येथे तिन्ही पॅनेलचे उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्यांचा त्यात भरणा आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर छुप्या पद्धतीने ‘क्राॅस व्होटिंग’ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमके कोणाचे पॅनेल विजयी होईल, याबाबत राजकीय वर्तुळातून ठोस अंदाज व्यक्त केला जात नाही.

नेर्ले-तांबवे, बोरगाव-रेठरे हरणाक्ष, येडेमच्छिंद्र-वांगी या तिन्ही गटामधील सर्वच उमेदवार निवडून येण्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे या निकालाबाबत तिन्ही गटांतून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी निकालाआधीच जेवणावळी पार पडल्या आहेत.