शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

अनिल परब यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

सांगली : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची किती दखल घ्यावी हा प्रश्न आहे. असे कोणीही आरोप ...

सांगली : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची किती दखल घ्यावी हा प्रश्न आहे. असे कोणीही आरोप करू लागले तर त्यातील तथ्य तपासणे आवश्यक असून, परब यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

कोरोना उपाययोजना आढावा बैठकीसाठी आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांतील पत्राचा ड्राफ्ट विशिष्ट पद्धतीचा आहे. असे आरोप व्हायला लागले तर त्याची दखल किती घ्यायची हा प्रश्नच आहे. आरोपात तथ्य किती हेही तपासणे आवश्यक असून, चौकशी निष्पक्षपातीपणे होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी प्रयत्न केले आणि राज्य शासन त्यासाठी कटिबद्ध आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट करावी. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या भेटीघाटी सुरू केल्या आहेत. संसदेत दबाव आणावा यासाठी त्यांची मागणी आहे. राज्य शासनही याच मागणीवर ठाम असून, आता केंद्रानेच आपली भूमिका स्पष्ट करावी.

चौकट

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील

राज्यातील काही भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे, तर काही भागात रुग्णसंख्या कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यायची की वाढ आणि एकूण नियमावलीबाबत आता मुख्यमंत्री स्वत: निर्णय घेणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.