शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

समविचारी लोकांना एकत्रित घेऊ

By admin | Updated: July 2, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : बाजार समिती निवडणूक; तालुका नेत्यांना अधिकार

सांगली : काँग्रेसच्या नेत्यांसह समविचारी लोकांना बरोबर घेऊन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्यात येईल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा किंवा बैठक झालेली नाही. त्यात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असल्यामुळे त्या-त्या तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनीच याबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत. माझ्याशी त्यांची चर्चा झालेली नाही. चर्चेवेळी याबाबतचे धोरण ठरेल. काँग्रेसमधील लोकांना प्राधान्य देऊन समविचारी लोकांना एकत्रित करून बाजार समितीची निवडणूक लढवली जाईल. ऊस दराबाबत ते म्हणाले की, साखर कारखान्यांसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी, महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. यासंदर्भातील केंद्र व राज्य शासनाचा घोळ सुरूच आहे. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ व टेंभू योजनेच्या उर्वरित कामांना आघाडी सरकारच्या कालावधित गती मिळाली होती. आता या योजना गोगलगायीच्या गतीने सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत या योजना नव्या सरकारला पूर्ण कराव्याच लागतील. आम्ही त्याबाबतचा पाठपुरावा करीत आहोत, असेही ते म्हणाले.सध्याच्या सरकारचे सिंचन योजनांकडे दुर्लक्ष होत आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, लक्ष असले तर दुर्लक्ष होईल ना! लोकांना सर्व गोष्टी दिसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला. (प्रतिनिधी)राज्यभर मोर्चे काढणारविविध प्रश्नांवर सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ आणि १0 जुलै रोजी मोर्चे काढून निदर्शने केली जातील. सांगलीतील मोर्चा ९ जुलै रोजी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सध्या सर्वांत गंभीर आहे. असे सर्वच प्रश्न आम्ही अधिवेशनात उपस्थित करणार आहोत, अशी माहिती पतंगराव कदम यांनी दिली. बाजार समितीत मदन पाटील-जयंत पाटील यांच्यात युती झाली आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कदम म्हणाले की, त्यांच्या युतीबाबत मला काहीही माहिती नाही. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाजार समितीबाबत निर्णय घेतला जाईल.