शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

मिरजेत काँग्रेसचा ठराव : जयंत पाटील यांच्यावर नेत्यांचे टीकास्त्र

By admin | Updated: June 11, 2016 01:27 IST

मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

मिरज : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर लढविण्याचा ठराव मिरजेत झालेल्या काँगे्रसच्या तालुका मेळाव्यात करण्यात आला. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, गटा-तटाचे राजकारण करू नये, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याबाहेरील नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले. मिरजेत राजपूत हॉलमध्ये तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शैलजा पाटील उपस्थित होते. प्रतीक पाटील म्हणाले की, वसंतदादांचा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याच्या नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. परंतु काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजप शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्यामुळे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळले आहेत.मोहनराव कदम म्हणाले की, काँग्रेस भांडणारा नव्हे, संस्कार असलेला हा पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यातील गटबाजी संपवावी. तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. पंचायत समिती सभापती जयश्री पाटील, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, दिलीप बुरसे, सुभाष पाटील, सदाशिव खाडे, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतराव गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)