शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मिरजेत काँग्रेसचा ठराव : जयंत पाटील यांच्यावर नेत्यांचे टीकास्त्र

By admin | Updated: June 11, 2016 01:27 IST

मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

मिरज : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर लढविण्याचा ठराव मिरजेत झालेल्या काँगे्रसच्या तालुका मेळाव्यात करण्यात आला. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, गटा-तटाचे राजकारण करू नये, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याबाहेरील नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले. मिरजेत राजपूत हॉलमध्ये तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शैलजा पाटील उपस्थित होते. प्रतीक पाटील म्हणाले की, वसंतदादांचा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याच्या नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. परंतु काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजप शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्यामुळे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळले आहेत.मोहनराव कदम म्हणाले की, काँग्रेस भांडणारा नव्हे, संस्कार असलेला हा पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यातील गटबाजी संपवावी. तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. पंचायत समिती सभापती जयश्री पाटील, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, दिलीप बुरसे, सुभाष पाटील, सदाशिव खाडे, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतराव गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)