शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

माणिकराव ठाकरेंसमोर काँग्रेसची दुफळी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:03 IST

इस्लामपुरातील चित्र : दोन गटांकडून वेगवेगळा सत्कार; सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था...

अशोक पाटील -- इस्लामपूर -राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या वाळवा तालुक्यात काँग्रेसची अवस्था बिनबुडाच्या घागरीसारखी आहे. मात्र आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा त्यांच्याकडून सुरू आहे. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे येथील विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांना डावलून ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे जितेंद्र पाटील यांनीही स्वतंत्रपणे ठाकरे यांची भेट घेऊन भूमिका मांडली. सत्कारही झाले. यामुळे पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आली.वाळवा तालुक्यात कधी वसंतदादा घराणे, तर कधी माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांच्या ताकदीवर काँग्रेसचा गाडा हाकण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, वैभव पवार, विजय पवार, आनंदराव पाटील यांचा समावेश आहे. हे नेते काँग्रेसचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्याचा आव आणत असतात. त्यामुळे तुरळक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी टॉनिक पाजावे लागते. तरीही काँग्रेस अशक्तच आहे.माणिकराव ठाकरे आल्यानंतर बाळासाहेब पाटील हे विजय पवार, आनंदराव पाटील, जयकर कदम, दादासाहेब पाटील, शशिकांत लोहार, प्रकाश पोरवाल, हणमंत जाधव, शिवाजी मस्कर, बाळासाहेब पवार, तौफीक मुजावर, किसन पाटील यांच्यासमवेत ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. ही माहिती समजताच जितेंद्र पाटील यांनीही कार्यकर्त्यांसमवेत ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आर. आर. पाटील, जयकर कदम, दादासाहेब पाटील, विशाल शिंदे, दीपक लकेसर, अर्जुन खरात, भाऊ पाटील होते. यामुळे पक्षातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर आली.तालुकाध्यक्ष या नात्याने बाळासाहेब पाटील यांनी माणिकराव ठाकरे यांच्या दौऱ्याची कोणतीही कल्पना दिली नाही. कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांचे प्रयत्न तोकडे आहेत.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य.माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील वाळवा तालुक्यात काँग्रेसचे, तर कऱ्हाड तालुक्यात भाजपचे नेतृत्व मानतात. यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दुरावलो आहोत.- विजय पवार, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.