शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळे काँग्रेसला फटका

By admin | Updated: October 23, 2014 00:05 IST

विधानसभा निवडणूक : महापालिका निवडणुकीपेक्षा कमी मते

सांगली : पक्षांतर्गत गटबाजी, बंडखोरीचे लागलेले ग्रहण आणि छुप्या कुरघोड्यांनी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली एकूण मते व त्यांची टक्केवारी पाहता, विधानसभा निवडणुकीत यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पक्षांतर्गत गटबाजीने डोके वर काढले होते. दिगंबर जाधव यांनी बंडखोरीचे संकेत दिले. त्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनीही बंडखोरी केली. उघडपणे बंडखोरीचा झेंडा एकीकडे फडकविला जात असतानाच, पक्षांतर्गत एकत्र दिसणाऱ्या नेत्यांमधील सूर जुळत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. महापालिका निवडणुकीत कदम व दादा घराण्याने एकसंधपणे ताकद लावल्यामुळे जयंत पाटील यांच्या हातून महापालिकेची सत्ता पुन्हा काँग्रेसने काबीज केली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा बंडखोरी आणि नेत्यांमधील एकसंधपणाची उणीव दिसून आली. मोदी लाटेचा फटका काँग्रेसला बसतानाच अन्य कारणांमुळेही पक्षाची पीछेहाट झाली. यामध्ये राष्ट्रवादीने केलेला विरोधी प्रचार, पक्षांतर्गत संघर्ष या गोष्टींचा समावेश होता.विधानसभा निवडणुकीत पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकच एकसंधपणे लढत होते. पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकांचे अस्तित्व ठळकपणे दिसत होते. बंडखोरीला तोंड देत या समर्थकांनी एकहाती किल्ला लढविला. बंडखोरांमुळे मोठी मतविभागणी होईल, ही शंका त्यांनी खोटी ठरवली. बंडखोरांना कमी मते मिळाली असली तरी, पक्ष आणि पक्षाचे नेते म्हणून काम करणाऱ्यांमध्ये कुठेही सुसूत्रता दिसून आली नाही. ऐन विधानसभा निवडणुकीतच माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पतंगराव कदम यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उमेदवारी निश्चित करण्यावरून तसेच रणनीती ठरविण्यावरून नेत्यांचे सूर बिघडले होते, हे यावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच विजयासाठी आवश्यक असलेली फिगर गाठणे काँग्रेसला शक्य झाले नाही. सांगली शहरापेक्षा मिरजेत काँग्रेसअंतर्गत गोंधळ मोठा होता. याठिकाणचे अनेक नगरसेवक सांगलीकरांच्या प्रचारासाठी धडपडत होते. पक्षाच्या उमेदवाराकडील यंत्रणा कमी पडत होती. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर गेला असला तरी, याठिकाणी यश मिळविणे काँग्रेसला अवघड नव्हते. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच अधिकृत उमेदवारांना फटका बसल्याचे स्पष्टपणे आता दिसून येत आहे. काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे व गटबाजीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला विरोधी उमेदवारांपेक्षा स्वकीयांपासूनच अधिक धोका वाटत आला आहे. त्यामुळे उमेदवारांची बरीचशी शक्ती या गोष्टी रोखण्यासाठीच खर्ची पडत आहे. त्याचा फटका प्रत्येकवेळी उमेदवारांना बसत आहे. (प्रतिनिधी)मदन पाटील यांच्याकडून ६६ हजारांची हॅट्ट्रिकमदन पाटील यांना गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतांची बेरीज ६६ हजारांच्याच घरात आहेत. २00४ मध्ये जेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना ६६ हजार ५६३ मते मिळाली होती. २00९ मध्ये ते पराभूत झाले त्यावेळीही त्यांना ६६ हजार २४0 मते मिळाली होती. या निवडणुकीतही त्यांना ६६ हजार ४0 मते मिळाली आहेत. म्हणजेच मदन पाटील यांना प्रत्येकवेळी ६६ हजार मते मिळाली आहेत. त्यांच्या मतात काहीच फरक पडला नाही. नव्याने मतदार खेचण्यात ते कमी पडले असावेत, असाही एक तर्क आता लढविला जात आहे. एकूण मतांच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर, सांगलीतून र्कांग्रेसला महापालिका निवडणुकीत ३८.५0 टक्के मतदान झाले होते, तर सांगली विधानसभा मतदारसंघातून ३४ टक्केच मते मदन पाटील यांना पडली. मिरजेतील महापालिकेच्या निवडणुकीतील टक्केवारी आणि विधानसभेची टक्केवारी यात मोठी तफावत आहे.