शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी

By admin | Updated: May 25, 2016 23:34 IST

जिल्हा परिषद निवडणूक : भाजप, शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

अशोक डोंबाळे-सांगली अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सदस्यांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांनी प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक पक्षीय चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून सांगलीकडे पाहिले जाते. येथे प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. यामुळे निवडणूक कोणतीही असो, ती रंगतदार होतेच. जिल्हा परिषदेत सध्या ६२ गट आणि दहा पंचायत समित्यांत १२४ गण अस्तित्वात आहेत. या गट आणि गणांच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांची संख्या कमी होणार नसली, तरी काही गावे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांसह सदस्य आपापल्या मतदारसंघात अधिकाधिक कामे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष करून रस्ते, बंधारे, शाळा खोल्यांना अधिक मागणी आहे. यासह तीर्थक्षेत्र विकासाची कामे करण्यावर त्यांचा भर आहे. कामांच्या उद््घाटनाचा धडाका जिल्हाभर सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपमध्ये गेले असून, यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून अनिल बाबर आमदार झाले आहेत. बाबर यांचे आटपाडी, खानापूर दोन्ही तालुक्यात वजन असल्यामुळे त्यांचे समर्थकही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. काँग्रेसलाही जिल्हाध्यक्ष म्हणतात...जिल्हा परिषदेत काँग्रेसला निश्चित चांगले यश मिळणार आहे. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी केली जात आहे. काँग्रेस चिन्हावर निवडणूक लढविणार असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार नाही. कार्यकर्त्यांचा आघाडीस विरोध आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे.- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यंदा भाजप सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये काही नेते आले आहेत. त्यामुळे भाजप मजबूत झाला आहे. या नेत्यांचा पक्षाला फायदा होणार आहे. - पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप. जिल्हा परिषदेत यंदा शिवसेना खाते खोलणार आहे. जिल्हाभर शिवसैनिकांचे जाळे तयार झाले आहे. याचा फायदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार आहे. यामुळे आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन पक्ष मजबूत केला जात आहे.- आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष शिवसेना.काही ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे.