शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चासाठी जिल्ह्यातील तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईत ९ आॅगस्टला निघणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील सुकाणू समितीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील मोर्चाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे व पार्किंगसंदर्भातील नकाशे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातून किमान दीड लाख लोक मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले ...

ठळक मुद्दे दीड लाख लोक मुंबईला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईत ९ आॅगस्टला निघणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील सुकाणू समितीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील मोर्चाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे व पार्किंगसंदर्भातील नकाशे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातून किमान दीड लाख लोक मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, आजवर राज्यात मराठा समाजाचे एकूण ५१ मोर्चे निघाले. तरीही अद्याप हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे मुंबईचा निर्णायक मोर्चा काढण्याची तयारी राज्यभरातील समाजबांधवांनी केली आहे.गेल्या महिन्याभरापासून याची तयारी सुरू आहे. मुंबईत राज्यस्तरीय बैठकीत नियोजनाबाबत अनेकवेळा चर्चा होऊन त्यापद्धतीने नियोजनही झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच लोक घेऊन त्याचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. सरकारकडे काय मागण्या करायच्या, याचा मसुदा तयार झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील तयारी पूर्ण झाली असली तरी, मोर्चाच्या दिवसापर्यंत नियोजनात सुकाणू समिती लक्ष देणार आहे. जिल्ह्यातील ७९४ गावे आणि वाड्या-वस्त्यांपैकी जवळपास पावणेसहाशे गावांपर्यंत मराठा क्रांती मोर्चासंदर्भात संवाद साधण्यात आला आहे.ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईला निघणाºया मोर्चामध्ये प्रत्येकाने स्वखर्चाने सहभागी होण्यासाठी यायचे आहे. मुंबईमध्ये मोर्चाच्यादिवशी ३ कोटीहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत ज्यांचे नातेवाईक व मित्र आहेत, अशा लोकांनी तीन दिवस अगोदरच मुंबई गाठावी. रेल्वेगाड्यांची माहितीही प्रत्येकाने घ्यावी, म्हणजे मुंबईला जाताना कोणताही त्रास होणार नाही.पनवेलपर्यंत जाण्यास जिल्ह्यातील लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याठिकाणाहून लोकलने आझाद मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. मोर्चात सहभागी होणाºया लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नियोजनावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.यावेळी श्रीरंग पाटील, धनंजय वाघ, विलास देसाई, संदीप पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील, धनाजी कदम, विजय पाटील, मनीषा माने आदी उपस्थित होते.पार्किंगसाठी पुरेशी जागामुंबईमध्ये पनवेल ते वाशिमपर्यंत रेल्वे लाईनच्या बाजूस पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. पार्किंगसाठी नकाशात उल्लेख केलेल्या जागांमध्ये समाजबांधवांनी अपाली वाहने लावावीत, असे आवाहन संजय पाटील यांनी यावेळी केले.प्रत्येक घरातून एकजणमराठा समाजाच्या मोर्चासाठी जिल्ह्यातील प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती सहभागी व्हावी, अशी अपेक्षा आहे. समाजाला पाठिंबा देण्यासाठी अन्य समाजाच्या लोकांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्वांचे आम्ही स्वागत करीत आहोत.सांगली, मिरजेत रॅलीयेत्या शनिवारी ५ आॅगस्ट रोजी सांगली व मिरजेत मोटारसायकल रॅली काढून मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहेत. मिरजेतील रॅली सांगलीतील रॅलीत सहभागी होणार आहे. याचे नियोजन येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.