शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

महापालिकेतील घोटाळ्यांची ‘ईडी’कडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST

सांगली : महापालिकेच्या सुरुवातीच्या १७ वर्षांतील सुमारे १,५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल करण्यात आली असून, ...

सांगली : महापालिकेच्या सुरुवातीच्या १७ वर्षांतील सुमारे १,५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल करण्यात आली असून, याप्रकरणी आवश्यक सर्व पुरावेही सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून २०१५ पर्यंत शासनामार्फत वेळावेळी लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये अनेक घोटाळे उजेडात आले. काही प्रकरणात वसुलीचे स्पष्ट आदेशही देण्यात आले होते. तरीही त्यावर गेल्या २३ वर्षांत कोणतीही कारवाई शासनाने केलेली नाही. जवळपास १ हजार ५०० कोटी रुपयांचे हे घोटाळे आहेत. जनतेच्या खिशातील कररूप पैशाची लूट तत्कालीन कारभाऱ्यांनी केली आहे.

आम्ही यापूर्वी नगरविकास खाते, सार्वजनिक खाते, विभागीय आयुक्त, पुणे आणि तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकासमंत्री, तसेच विद्यमान मुख्यमंत्री व विद्यमान नगरविकासमंत्री, न्यायालये, लेखापरीक्षण विभाग, पुणे व मुंबई यांच्याकडे गेली २३ वर्षे लेखी तक्रारी करीत आहोत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने सारे पक्ष एकमेकांना अभय देण्यातच तत्पर असतात.

१९९८ ते २०१० अखेरच्या लेखापरीक्षणातून भार अधिभाराखाली वसूल पात्र रकमा अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या आहेत. त्या वसुलीसाठी आम्ही

अनेक वेळा लिखित तक्रारी केल्या. मात्र, त्याला दादच दिली गेली नाही. मात्र, २०१२ च्या लेखापरीक्षणामधील आरोप क्र. १२२ च्या वसुलीचे आदेश लेखापरीक्षण नवी मुंबई या कार्यालयाने महापालिकेला केली. महापालिकेनेही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेकडो नगरसेवकांना नोटिसा पाठविल्या. त्यातील सात माजी नगरसेवक व दोन विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेकडे पैसे भरले. मात्र, विद्यमान आयुक्तांनी पुढे सर्व प्रक्रिया थांबविली. आम्ही स्थानिक कोर्टात वसुलीचा दावा दाखल केला आहे. तो कोरोनामुळे ठप्प आहे.

चौकट

पंतप्रधानांनाही पत्र

ईडीसह बर्वे यांनी पंतप्रधानांनाही एक प्रत पाठविली आहे. ईडीच्या कार्यशैलीबद्दल माहिती असल्याने महापालिकेतील घोटाळ्याबाबत दाखल झालेल्या देशातील पहिल्याच तक्रारीची दखल हा विभाग घेईल, अशी अपेक्षा या पत्रात त्यांनी व्यक्त केली आहे.