कवठे एकंद : शिरगाव-कवठे (ता. तासगाव) हद्दीतील शिरगाव - तासगाव रस्त्यालगतच्या शेताच्या कुंपनाला भिंत उभारुन अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी शिरगाव कवठे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. हे अतिक्रमण न काढल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिरगाव-कवठे ग्रामपंचायतीने शिरगाव कवठे हद्दीतील शिरगाव ते तासगाव रस्त्यालगत गट नं. ५६ मध्ये नागेश श्रीशल स्वामी यांचे शेत आहे. या शेताच्या कुंपणाची भिंत शिरगाव रस्त्याच्या गटारावर बांधण्यात आली आहे. याबाबत तासगाव सार्वजनिक बांधकाम विभाग, तासगाव यांच्याकडे अतिक्रमण काढण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. हे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे, अशी माहिती सरपंच अनिल पाटील यांनी दिली.