शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या १०५ कोटींप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

सांगली : समाजकल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यांना दिलेल्या व अखर्चित म्हणून परत घेतलेल्या १०५ कोटींच्या निधीप्रकरणी चौकशी करण्याची मागणी ...

सांगली : समाजकल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यांना दिलेल्या व अखर्चित म्हणून परत घेतलेल्या १०५ कोटींच्या निधीप्रकरणी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनने राज्यपालांकडे केली आहे.

युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३१ मार्च २०२१ रोजी शासनाचे ऑडिटचे काम असते. समाजकल्याण आयुक्तांनी व सचिवांनी त्या रात्री म्हणजेच १२ वाजता कोट्यवधींचा निधी प्रत्येक विभागास जमा करण्याचे नियोजन का केले? याआधीच का जमा केला नाही ? प्रत्यक्षात हा निधी कागदोपत्री जमा झाल्याचे सांगण्यात आले, पण तो मिळाला नाही असे सांगली जिल्ह्याचे सहायक आयुक्त खुलासे देत आहेत. हाच गौडबंगाल आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

३१ मार्च रात्री १२ वाजता छुप्या दाराने निधी पाठविण्याचे नाटक करणे व नंतर तांत्रिक अडचणीमुळे निधी जमा झाला नाही असे सांगणे व निधी परत जाणे यातच मोठा अपहार आहे. आयुक्त नारनवरे व सचिव तागडे यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी व याची चौकशी करायला हवी.

या निधीचा वापर अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये सोयी-सुविधा देण्यासाठी वापर करणेदेखील गरजेचे होते, पण तसे झाले नाही. एकूण ३० जिल्ह्यांमधून १०५ कोटींचा निधी विनावापर परत गेलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे समाज कल्याणचे धोरण यातून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून हे कारस्थान रचले आहे. त्यामुळे याप्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.