शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

चला, कोरोनाला हरवूया, पुन्हा शाळेत जाऊया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना ...

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.

शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्यासाठी १० मार्चपर्यंत मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रादुर्भावाने राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. परिणामी या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाशी नियमित प्रवाह तुटला. या मोहिमेतून त्यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव, शहरे, गजबजलेल्या वस्त्या, बस व रेल्वे स्थानके, बाजार, गुऱ्हाळगरे, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, साखर कारखाने, स्थलातरित कुटुंबे, पदपथ व सिग्नल, गावकुसाबाहेर राहणारे भटके यांच्या वस्त्या धुंडाळल्या जाणार आहेत.

या मोहिमेत कोरोनाचा अडसर मोठा ठरला आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून मुले शाळेतच आलेली नाहीत, त्यामुळे ती थेट शालाबाह्य ठरली आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने कुटुंबे कोरोनाकाळात गावाकडे स्थलांतरित झाली. त्यांची मुलेही शालाबाह्य ठरली आहेत. त्यांना शाळेच्या संपर्कात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्याने ती ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली, तीदेखील शालाबाह्य ठरली आहेत. आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने त्यांना प्रवाहात आणावे लागणार आहे. ग्रामीण भागात आठवी-नववीनंतर अनेक मुलांनी कोरोना काळात शाळेला कायमची सोडचिठ्ठी दिल्याचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.

कोरोनामुळे बैठका झाल्याच नाहीत

मार्चमध्ये सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी बैठका होणे अपेक्षित होते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा, तालुका व गावस्तरावर या बैठका होतात; पण यंदा कोरोनामुळे त्यावर मर्यादा आल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखून बैठकांचे आयोजन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; पण गावस्तरावर व्यापक बैठका शक्य झाल्या नाहीत. तरीही घरोघरी संपर्काचे नियोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून अंगणवाडी सेविकांपर्यंत प्रत्येकाचा यामध्ये सहभाग घेण्यात आला.

चौकट

ग्रामसेवकांना सूचनाच नाहीत

या मोहिमेत ग्रामसेवकांचा सहभाग अपेक्षित आहे. गावपातळीवर स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार यांच्या नोंदी ठेवून त्या पथकाला देण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर असेल; पण जिल्ह्यात अद्याप त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. तशा कोणत्याही सूचना नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. १० मार्चला मोहीम संपणार असल्याने आता ग्रामसेवकांच्या सहभागाची शक्यताही नाही असेही सांगण्यात आले.

चौकट

आम्ही गावकुसाबाहेरचेच !

१. गावोगावी सर्वेक्षण सुरू असले तरी शंभर टक्के स्थलांतरितांपर्यंत पथके अद्याप पोहोचलेली नाहीत. म्हैसाळ प्रकल्पाच्या शाखा कालव्यांच्या अस्तरीकरण कामी अनेक मजूर जिल्हाभरात आले आहेत. त्यांची मुले अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे.

२. जिल्ह्यात हजारो ऊसतोड कामगार गावोगावी पाल ठोकून राहत आहेत. काही कारखान्यांचे गाळप संपत आल्याने तेथील कामगार गावाकडे परतू लागले आहेत. अशी प्रवासातील कुटुंबेदेखील सर्वेक्षणात आलेली नाहीत. अद्याप मागे राहिलेल्या कुटुंबांशी १० मार्चपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असेल.

पाॅईंटर्स

- शालाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्हाभरात नेमलेली पथके - ६६०

- एकूण कर्मचारी संख्या - ७०००

- तालुकानिहाय पथके

मिरज ११०, वाळवा ६०, जत ९०, आटपाडी ६०, तासगाव ५०, शिराळा ४०, कवठेमहांकाळ ५०, कडेगाव ५०, खानापूर ७०, पलूस ४०

कोट

१ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाभरात शालाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली जात आहे. विशेषत: कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्यांचीही नोंद घेतली जात आहे. मोठ्या शहरांतून अनेक कुटुंबे लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतली, त्यांच्या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी.