शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

चला, कोरोनाला हरवूया, पुन्हा शाळेत जाऊया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना ...

सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या संकटकाळात शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.

शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्यासाठी १० मार्चपर्यंत मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रादुर्भावाने राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. परिणामी या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाशी नियमित प्रवाह तुटला. या मोहिमेतून त्यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव, शहरे, गजबजलेल्या वस्त्या, बस व रेल्वे स्थानके, बाजार, गुऱ्हाळगरे, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, साखर कारखाने, स्थलातरित कुटुंबे, पदपथ व सिग्नल, गावकुसाबाहेर राहणारे भटके यांच्या वस्त्या धुंडाळल्या जाणार आहेत.

या मोहिमेत कोरोनाचा अडसर मोठा ठरला आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून मुले शाळेतच आलेली नाहीत, त्यामुळे ती थेट शालाबाह्य ठरली आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने कुटुंबे कोरोनाकाळात गावाकडे स्थलांतरित झाली. त्यांची मुलेही शालाबाह्य ठरली आहेत. त्यांना शाळेच्या संपर्कात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्याने ती ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली, तीदेखील शालाबाह्य ठरली आहेत. आता शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने त्यांना प्रवाहात आणावे लागणार आहे. ग्रामीण भागात आठवी-नववीनंतर अनेक मुलांनी कोरोना काळात शाळेला कायमची सोडचिठ्ठी दिल्याचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.

कोरोनामुळे बैठका झाल्याच नाहीत

मार्चमध्ये सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी बैठका होणे अपेक्षित होते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा, तालुका व गावस्तरावर या बैठका होतात; पण यंदा कोरोनामुळे त्यावर मर्यादा आल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखून बैठकांचे आयोजन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; पण गावस्तरावर व्यापक बैठका शक्य झाल्या नाहीत. तरीही घरोघरी संपर्काचे नियोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून अंगणवाडी सेविकांपर्यंत प्रत्येकाचा यामध्ये सहभाग घेण्यात आला.

चौकट

ग्रामसेवकांना सूचनाच नाहीत

या मोहिमेत ग्रामसेवकांचा सहभाग अपेक्षित आहे. गावपातळीवर स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार यांच्या नोंदी ठेवून त्या पथकाला देण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर असेल; पण जिल्ह्यात अद्याप त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. तशा कोणत्याही सूचना नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. १० मार्चला मोहीम संपणार असल्याने आता ग्रामसेवकांच्या सहभागाची शक्यताही नाही असेही सांगण्यात आले.

चौकट

आम्ही गावकुसाबाहेरचेच !

१. गावोगावी सर्वेक्षण सुरू असले तरी शंभर टक्के स्थलांतरितांपर्यंत पथके अद्याप पोहोचलेली नाहीत. म्हैसाळ प्रकल्पाच्या शाखा कालव्यांच्या अस्तरीकरण कामी अनेक मजूर जिल्हाभरात आले आहेत. त्यांची मुले अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे.

२. जिल्ह्यात हजारो ऊसतोड कामगार गावोगावी पाल ठोकून राहत आहेत. काही कारखान्यांचे गाळप संपत आल्याने तेथील कामगार गावाकडे परतू लागले आहेत. अशी प्रवासातील कुटुंबेदेखील सर्वेक्षणात आलेली नाहीत. अद्याप मागे राहिलेल्या कुटुंबांशी १० मार्चपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असेल.

पाॅईंटर्स

- शालाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्हाभरात नेमलेली पथके - ६६०

- एकूण कर्मचारी संख्या - ७०००

- तालुकानिहाय पथके

मिरज ११०, वाळवा ६०, जत ९०, आटपाडी ६०, तासगाव ५०, शिराळा ४०, कवठेमहांकाळ ५०, कडेगाव ५०, खानापूर ७०, पलूस ४०

कोट

१ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाभरात शालाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली जात आहे. विशेषत: कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्यांचीही नोंद घेतली जात आहे. मोठ्या शहरांतून अनेक कुटुंबे लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतली, त्यांच्या मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी.