शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा साहित्यात मिलाफ

By admin | Updated: December 21, 2015 00:47 IST

शेखर गायकवाड : अमीन यांच्या स्मृतिदिनानिमत्त सलोखा संमेलन

सांगली : समाजात वेगवेगळे वैचारिक प्रवाह निर्माण होत असताना, आपल्या पुस्तकातून हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा आढावा घेत त्याचा मिलाफ साधणारे साहित्यिक सय्यद अमीन यांचा आदर्श जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रविवारी केले. माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यिक सय्यद अमीन यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सलोखा साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते. गायकवाड पुढे म्हणाले, भारतीय समाजाचा विशेषत: हिंदू-मुस्लिम समाजातील संस्कृतीचा विचार करता, त्यात साम्यता दिसून येते. एकरूप झालेला समाज म्हणूनही याकडे पाहिले जाते. सांस्कृतिक चळवळ पुढे गेल्यास राजकीय पक्षांच्या माध्यमातून मांडण्यात येणारे प्रश्न आपसुकपणे मागे पडत असतात. आपल्या लिखाणातून हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा मिलाफ साधणाऱ्या अमीन यांनी समाजाला वरच्या स्तरावरचा विचार करायला लावला. त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सय्यद अमीन यांच्या ‘हिंदू-मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ’ या पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, आमदार असतानाही आपल्या वर्तणुकीत त्याचा प्रत्यय आणू न देता, साधे राहणीमान असलेले सय्यद अमीन हे आदर्शवत आमदार होते. त्यांच्या राहणीमानावरुन त्यांच्या विचारांची उंची समजत असल्याने, त्यांचे साहित्य उल्लेखनीय असेच आहे. त्यांनी मांडलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत. या परिसंवादात डॉ. बी. डी. पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर यांनीही सहभाग घेतला. यावेळी सिकंदर अमीन, डॉ. नितीन पाटील, इरफान पेंढारी उपस्थित होते. (वार्ताहर)