शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

कोकरुडची पाणी योजना आठ वर्षांपासून बंद...

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

ग्रामपंचायत उदासीन : लाखो रुपये पाण्यात

संजय घोडे-पाटील -कोकरुड (ता. शिराळा) येथे भारत निर्माण योजनेतून सुमारे १६ लाख रुपये खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना आठ वर्षांपासून सुरू होण्याआधीच बंद अवस्थेत आहे. याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत.येथील गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गवळोबा रस्त्यानजीक कचऱ्याचा मोठा ढीग साठला आहे व बाजूलाच स्वच्छतागृह नसल्याने एका पडक्या भिंतीच्या बाजूचा परिसर गलिच्छ केला आहे. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असून, ही हद्द माळेवाडी-कोकरुड यामध्ये येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. गावाला स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने येथील जि. प. शाळेपाठीमागे उभी केलेली पाण्याची टाकी उभारतानाच कलली होती. शेजारील फिल्टर टँक गंजून गेला आहे. नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणारी पाईपलाईनही अपुऱ्या अवस्थेत आहे. तरीही शासनाचा या कामामधील लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी संगनमताने लाटला आहे. ही योजना अपुरी असतानाही ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतलीच कशी? तिला काम पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट (अहवाल) कोणी दिला? त्याचे बिल मंजूर झालेच कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.गावाला शासनाच्या विविध निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये मिळाले आहेत. त्यामधून चार/चार पाणी योजना असतानाही पिण्यासाठी पुरसे पाणी उपलब्ध नाही. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संगनमताने शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घातला आहे. चार वर्षापूर्वी संजय शिवाजी घोडे (मायकल) या तरुणाने शोले स्टाईलने या पाण्याच्या टाकीवर चढून अभिनव आंदोलन केले होते. राजकीय कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.गावातील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाची दुरवस्था झाल्यामुळे परिसरातून येणारी मंडळी, प्रवासी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय व जनावरांच्या दवाखान्याच्या भिंतीचा आधार घेऊन दुरुपयोग करीत आहेत. बसस्थानक परिसर व कोकरुड-मलकापूर रस्त्यावर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. तळे परिसर, चौगुले कॉर्नर, नांगरवाडा, खंदक, हरिजन वस्ती आदी ठिकाणी अशीच स्थिती आहे.विकास कामात लाखोंचा भ्रष्टाचारग्रामपंचायतीने शासनाच्या पर्यटन निधीतून काँक्रिटीकरण, नाले व पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत. मात्र अनेक गल्लीतील कामे अपूर्ण आहेत. जलशुध्दीकरण योजना मंजूर होऊन पूर्ण झाली, त्यावेळी वेगळे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी असल्याने याबाबत झालेल्या घडामोडींची आपल्याला काहीही कल्पना नाही. कोकरुड गावात झालेल्या अनेक विकास कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांंचा आरोप आहे.