शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कोकरुडची पाणी योजना आठ वर्षांपासून बंद...

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

ग्रामपंचायत उदासीन : लाखो रुपये पाण्यात

संजय घोडे-पाटील -कोकरुड (ता. शिराळा) येथे भारत निर्माण योजनेतून सुमारे १६ लाख रुपये खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना आठ वर्षांपासून सुरू होण्याआधीच बंद अवस्थेत आहे. याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत.येथील गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गवळोबा रस्त्यानजीक कचऱ्याचा मोठा ढीग साठला आहे व बाजूलाच स्वच्छतागृह नसल्याने एका पडक्या भिंतीच्या बाजूचा परिसर गलिच्छ केला आहे. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असून, ही हद्द माळेवाडी-कोकरुड यामध्ये येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. गावाला स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने येथील जि. प. शाळेपाठीमागे उभी केलेली पाण्याची टाकी उभारतानाच कलली होती. शेजारील फिल्टर टँक गंजून गेला आहे. नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणारी पाईपलाईनही अपुऱ्या अवस्थेत आहे. तरीही शासनाचा या कामामधील लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी संगनमताने लाटला आहे. ही योजना अपुरी असतानाही ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतलीच कशी? तिला काम पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट (अहवाल) कोणी दिला? त्याचे बिल मंजूर झालेच कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.गावाला शासनाच्या विविध निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये मिळाले आहेत. त्यामधून चार/चार पाणी योजना असतानाही पिण्यासाठी पुरसे पाणी उपलब्ध नाही. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संगनमताने शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घातला आहे. चार वर्षापूर्वी संजय शिवाजी घोडे (मायकल) या तरुणाने शोले स्टाईलने या पाण्याच्या टाकीवर चढून अभिनव आंदोलन केले होते. राजकीय कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.गावातील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाची दुरवस्था झाल्यामुळे परिसरातून येणारी मंडळी, प्रवासी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय व जनावरांच्या दवाखान्याच्या भिंतीचा आधार घेऊन दुरुपयोग करीत आहेत. बसस्थानक परिसर व कोकरुड-मलकापूर रस्त्यावर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. तळे परिसर, चौगुले कॉर्नर, नांगरवाडा, खंदक, हरिजन वस्ती आदी ठिकाणी अशीच स्थिती आहे.विकास कामात लाखोंचा भ्रष्टाचारग्रामपंचायतीने शासनाच्या पर्यटन निधीतून काँक्रिटीकरण, नाले व पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत. मात्र अनेक गल्लीतील कामे अपूर्ण आहेत. जलशुध्दीकरण योजना मंजूर होऊन पूर्ण झाली, त्यावेळी वेगळे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी असल्याने याबाबत झालेल्या घडामोडींची आपल्याला काहीही कल्पना नाही. कोकरुड गावात झालेल्या अनेक विकास कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांंचा आरोप आहे.