शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला ...

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे.‘लोकमत’ने याप्रश्नी आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला.उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रुप धारण करून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. तत्परतेने उद्घाटनांचा कार्यक्रम होत असताना, तितक्याच तत्परतेने कामे का सुरू होत नाहीत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले. पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आयोजित केला.राजकीय आरोप-प्रत्यारोप करून सर्व औपचारिकता पार पाडण्यात आली. निधी आणण्यासाठी कोणी किती कष्ट घेतले, याची कथाही सांगण्यात आली. पण या सर्व गोष्टी पोकळ ठरल्या.सर्व नेते गेले कुठे? : सतीश साखळकरनागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, थाटात उद्घाटन करणारे, सेल्फी घेऊन नंतर त्याचे श्रेय लाटणारे सारे नेते आता गेले कुठे? राजकारण करण्यासाठी कामे न करता उत्तरदायीत्व म्हणून काम करायला राजकारण्यांनी शिकावे. लोकांचे हाल काय होतात, याची कल्पना नेत्यांना नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. कोणी निधी आणल्याचा गाजावाजा करीत आहे, तर कुणी सेल्फीचा परिणाम झाल्याचे सांगत आहे. या गोष्टी या नेत्यांना अगोदर का सुचल्या नाहीत? लोकांना फसविण्याचे उद्योग आता बंद करावेत.