शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला ...

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे.‘लोकमत’ने याप्रश्नी आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला.उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रुप धारण करून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. तत्परतेने उद्घाटनांचा कार्यक्रम होत असताना, तितक्याच तत्परतेने कामे का सुरू होत नाहीत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले. पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आयोजित केला.राजकीय आरोप-प्रत्यारोप करून सर्व औपचारिकता पार पाडण्यात आली. निधी आणण्यासाठी कोणी किती कष्ट घेतले, याची कथाही सांगण्यात आली. पण या सर्व गोष्टी पोकळ ठरल्या.सर्व नेते गेले कुठे? : सतीश साखळकरनागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, थाटात उद्घाटन करणारे, सेल्फी घेऊन नंतर त्याचे श्रेय लाटणारे सारे नेते आता गेले कुठे? राजकारण करण्यासाठी कामे न करता उत्तरदायीत्व म्हणून काम करायला राजकारण्यांनी शिकावे. लोकांचे हाल काय होतात, याची कल्पना नेत्यांना नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. कोणी निधी आणल्याचा गाजावाजा करीत आहे, तर कुणी सेल्फीचा परिणाम झाल्याचे सांगत आहे. या गोष्टी या नेत्यांना अगोदर का सुचल्या नाहीत? लोकांना फसविण्याचे उद्योग आता बंद करावेत.