शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

ढग हटले, दुष्काळाचे संकट दाटले...

By admin | Updated: August 18, 2015 22:51 IST

केवळ ५५ टक्के पाऊस : ऐन पावसाळ्यात ३१ टँकर सुरू; रोहयो कामाला मागणी

अंजर अथणीकर- सांगलीजिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मंगळवार (१८ आॅगस्ट) अखेर सरासरीच्या तुलनेत केवळ ५५ टक्केच पाऊस बरसला आहे. ऐन पावसाळ्यात ३१ टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्या दहा दिवसात टँकरची संख्या दहाने वाढली असून, आता दिवसेंदिवस टँकरला मागणी वाढत आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात ३१ टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरद्वारे २९ गावे व १९२ वाड्यांतील ७८ हजार ७१३ लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनांच्या कामांनाही मागणी वाढली आहे. या योजनेंतर्गत ४२४ कामे सुरू असून, ४ हजार ९४२ मजूर काम करीत आहेत. ४७ लाखाहून अधिक मजूर क्षमतेची जवळपास आठ हजार कामे मंजूर करून ठेवण्यात आली आहेत. आॅगस्टचा पंधरवडा उलटला तरी सरासरीच्या तुलनेत ५५ टक्केच पाऊस झाला आहे. पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता विहीर अधिग्रहण सुरू करण्यात आले आहे. टंचाई आराखड्याचीही मुदत आता ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. एक हजार एकरमध्ये चारा घेणार!जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार एकरामध्ये चारा घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली. शासनाकडून यासाठी बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी म्हैसाळ, ताकारी व टेंभू, आरफळ योजनांचे पाणी आहे, अशा पट्ट्यात चारा घेण्यात येणार आहे. याची विक्री मात्र शेतकऱ्याला करावी लागणार आहे. उपलब्ध चारा पॅकिंगमध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे. चारा छावण्यांपेक्षा ही पध्दत सोयीची होणार आहे. येत्या आठ दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. उन्हाळ्यातील चटके पावसाळ्यातदिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जवळपास कमाल तापमान ३० अंशापर्यंत जात आहे. गेल्या आठ दिवसात किमान तापमान २२ ते २३ अंश असून, कमाल तापमान २८ ते ३० अंशादरम्यान आहे. मंगळवारी कमाल तापमान ३०.७, तर किमान तापमान २२.२ अंश इतके राहिले. उन्हाच्या तीव्रतेने पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे.