शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

‘झेडपी’ला विकलांग करण्यापेक्षा बंद करा

By admin | Updated: August 20, 2015 22:48 IST

सदस्य संतप्त : अधिकारात आमदार, खासदारांचे अतिक्रमण नको

सांगली : पाच वर्षांपूर्वी वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी जिल्हा परिषदेला मिळत होता. यामध्ये कपात करीत तो दहा टक्केपर्यंत आणला असून, यावर्षी तर निधीच बंद केला आहे. सर्वच अधिकार काढून जिल्हा परिषदेला विकलांग करण्यापेक्षा ती बंद करून थेट ग्रामपंचायतींना निधी द्या, अशी संतप्त मागणी सदस्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे गुरुवारी केली.जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना ७३ व्या घटनादुरुस्तीने अनेक अधिकार मिळाले होते. प्राचार्य पी. बी. पाटील समितीनेही जिल्हा परिषद बळकट करण्याची शिफारस केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करून आमदार, खासदार जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे अधिकार कमी करून त्यांना विकलांग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांचा निधीही थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या सर्व निर्णयांमुळे जिल्हा परिषद सदस्यांना काहीच काम राहिलेले नाही. उर्वरित योजनांचा निधीही शासन बंद करण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाशी निगडित जिल्हा परिषद, पंचायत समित्या शासनाने बंद करून राज्यकारभार करावा. पाटील, बर्डे यांच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही टाळ्या वाजवून पाठिंबा दिला.सदस्य रणधीर नाईक म्हणाले की, जिल्हा परिषद बंद करण्याची सदस्यांची मागणी चुकीची आहे, वित्त आयोगाचा निधी बंद केल्याबद्दल शासनाने अन्य योजनेतून जिल्हा परिषद सदस्यांसाठी निधी द्यावा, अशी मागणी करूया. यासंबंधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन द्यावे, एवढे करूनही शासनाने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर सर्व सदस्य मिळून आंदोलन करू. (प्रतिनिधी)कार्यकर्ता डोईजड नकोदहा वर्षांपूर्वी आमदार, खासदारांपेक्षाही जिल्हा परिषद सदस्यांना जास्त निधी मिळत होता. या निधीतून होणारी विकास कामे पाहून आमदार, खासदारांना जिल्हा परिषद सदस्य डोईजड होण्याची शक्यता वाटू लागल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने निधी बंद केला आहे. कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम विभागाकडील अनेक योजना राज्य शासनाच्या विभागाकडे वर्ग केल्या आहेत. आम्ही डोईजड ठरू नये, अशी नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आमच्या अधिकारावर त्यांचे अतिक्रमण सुरू असल्याचा सदस्यांनी आरोप केला. निधी कपात करून जिल्हा परिषद बंद करून राजकारण करूनच दाखवा, असे आव्हानही सदस्यांनी दिले.