शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

इस्लामपुरात भाजीपाल्याच्या नावाखाली नागरिक सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : संचारबंदीत किराणा, भाजीपाला विक्री अशा अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : संचारबंदीत किराणा, भाजीपाला विक्री अशा अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. मात्र आठवडी बाजार बंद झाल्याने इस्लामपुरातील भाजीपाला विक्रेते रहदारीच्या रस्त्यावरच बसतात. त्यामुळे तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर आहेच. शिवाय गर्दीमुळे वाहतूक कोंडीही होत आहे.

इस्लामपूर नगरपरिषदने भाजीपाला विक्रेत्यांना शहरात हातगाड्यावरून फिरून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इस्लामपूर-बहे या रहदारीच्या रस्त्यावर भाजी विक्रेते खुलेआम बसलेले असतात. याकडे पोलीस आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गर्दी होत आहे. कारवाई केल्यानंतरही पुन्हा हे भाजी विक्रेते रस्त्यावरच येऊन बसतात. यांच्यावर शासन यंत्रणेचा वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होत आहे. तालुक्यात सरासरी रोज दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस आघाडीवर असले तरी या कारवाईला आता नागरिक जुमानत नाहीत. विविध कारणाखाली नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. विशेषत: सकाळच्या सत्रात भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गर्दी होत आहे. भाजी विक्रेत्यांवर कडक निर्बंध घालण्याची गरज आहे.