शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मुलांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

शिरटे : मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी त्यांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे. सहा वर्षापर्यंत आईच्या खांद्या-मांडीवरती खेळणारी ...

शिरटे : मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी त्यांना सहा वर्षानंतरच शाळेत पाठवावे. सहा वर्षापर्यंत आईच्या खांद्या-मांडीवरती खेळणारी मुलंच जगातील सर्वात हुशार मुलं बनल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मी कसा घडलो’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुडाळकर म्हणाले, आई ही परिस्थितीचा बाऊ करणारी नसावी तर ती परिस्थितीवर विजय मिळवणारी असावी. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ज्या वयात आईच्या माया-ममतेची गरज असते, त्याच वयात मुलांना शाळेत घातले जाते. त्यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे. ज्या आई-वडिलांचे उच्चशिक्षण झाले आहे, त्यांनीच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवावे. आई-वडिलांनी योग्यवेळी मुलांच्या हाती पुस्तके दिली तर घराघरात साने गुरुजी तयार होतील. जागृती मंडळाच्या व्याख्यानमालेतील संस्काराच्या दालनातून निश्चितच स्वामी विवेकानंदांसारखी मुले निर्माण होतील, असे कुडाळकर यांनी सांगितले.

सुवर्णा कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर सचिन गोडसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर धनश्री राजहंस यांनी आभार मानले.