शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूरला विजेतेपद

By admin | Updated: October 26, 2016 00:07 IST

राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा : मुंबई व पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर; राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेशला

सांगली : अत्यंत चुरशीने झालेल्या चौदा वर्षे गटाच्या शालेय राज्य कबड्डी स्पर्धेवर मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूर विभागाने ठसा उमटवला. मुंबई व पुणे विभागास दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांमध्ये औरंगाबाद विरूध्द पुणे असा अंतिम सामना झाला. तगड्या औरंगाबादने अनुभवी पुण्याला जेरीस आणत ३६-१७ असा पुण्याचा पराभव केला. मुलींच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या रणरागिणींनी मुंबईला ४६-१७ अशा फरकाने नमवत विजेतेपद आपल्या नावे केले. राष्ट्रीय स्पर्धा हारडा (मध्य प्रदेश) येथे होणार आहेत. क्रीडाधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडल्या. पारितोषिक वितरण महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. शंकर भास्करे यांनी स्वागत केले. आमसिध्द सोलणकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे, शिवाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष बाबा पाटील, उद्योजक किसन गावडे, विजय यादव, नेताजी पाटील, सुनील पुजारी आदी उपस्थित होते. पंच म्हणून विनायक विभुते, जितेंद्र पाटील, मुन्ना आलासे, भालचंद्र जाधव, आलम मुजावर, जयराज पाटील, सुरेश चिखले, झाकीर इनामदार, सुशील गायकवाड, पंकज जाधव, विलास गायकवाड, सुशांत गडदे, रणजित इनामदार, एस. आर. कुंभार यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)सांगलीची पोरं अव्वल... कोल्हापूर विभागाने मुलींमध्ये प्रथम, तर मुलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर विभागाच्या मुले व मुली या दोन्ही यशस्वी संघांवर सांगली जिल्ह्याने आपली मोहोर उमटवली आहे. मुलींच्या संघात बावची (ता. वाळवा) येथील शिवाजी हायस्कूलच्या, तर मुलांच्या संघात कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत विद्यालयाच्या खेळाडूंचा भरणा होता. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : मुले : औरंगाबाद (प्रथम), पुणे (द्वितीय), कोल्हापूर (तृतीय) मुली : कोल्हापूर (प्रथम), मुंबई (द्वितीय), लातूर (तृतीय)