शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

मुख्यमंत्र्यांचे जातीवाचक विधान चूक

By admin | Updated: October 26, 2016 00:17 IST

जयंत पाटील : सोशल इंजिनिअरिंग करताना फडणवीस यांचा गोंधळ

सांगली : केवळ ब्राह्मण असल्याने मला मुख्यमंत्री-पदावरून कोणी काढणार नाही, असे जातीवाचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही कोणी जातीवाचक बोलले नाही. तरीही ते असे का बोलत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध जाती, धर्मांचे मोर्चे निघत असल्याने सोशल इंजिनिअरिंग कसे करायचे, याबाबत त्यांचा गोंधळ झालेला दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील सहकारी, घटक पक्षांचे नेते तसेच विरोधक म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुख्यमंत्री कुंडल्या काढण्याचा दम देत आहेत. शत्रू कोण आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांना कळेना झाले आहे. त्यांचे सहकारी मंत्रीही या गोष्टींना सामोरे गेले आहेत. आम्ही तर विरोधी पक्षातील असल्याने आम्हाला असा इशारा देणे स्वाभाविक आहे. सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली असताना, अशाप्रकारची दमाची भाषा योग्य नाही. कुंडल्या काढण्याचा इशारा देत कारभार करण्यापेक्षा गोडीगुलाबीने राज्य त्यांनी चालवावे. लोकांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. महागाईचा सामना जनता करीत असताना, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. अंदाजपत्रकामध्ये यांचे सरकार डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते आणि तरीही ऐन सणासुदीला डाळीचे दर गगनाला भिडलेले आहेत. दिवाळी झाल्यानंतर डाळीचे दर उतरतील आणि हेच सरकार दर कमी केल्याचा डांगोरा पिटणार आहे. सामान्य लोकांसाठी कोणतेही नियोजन सरकार करीत नाही, ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत असतानाच पोलिसांवरही हल्ले होत आहेत. सक्षमपणाने गुन्हेगारी मोडीत काढण्याची यंत्रणाच सरकारकडे नाही. गृहमंत्रीपद सोडण्यास फडणवीस तयार नाहीत. स्वतंत्रपणे गृह खाते सांभाळणारा एखादा विश्वासातला सहकारीच त्यांच्याकडे नसावा, असे वाटते. (प्रतिनिधी)साखरेला जादा दर मिळावाएफआरपीपेक्षा जादा दर उत्पादकांना मिळायला हवा, अशी मागणी होत आहे. साखरेला जादा दर मिळाला की ही गोष्टही साध्य होऊ शकते. केंद्र शासनाचे धोरण पाहता, साखरेचे दर वाढूच नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ही नीती ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले. निवडणूक संस्थेची, कारखान्याची नव्हे‘सर्वोदय’च्या निवडणुकीबाबत जयंत पाटील म्हणाले की, ही कारखान्याची निवडणूक नसून, सर्वोदय कारखाना या संस्थेची निवडणूक आहे. शिवसेना लाचार का : सत्ता निरर्थक...सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती आहे. शिवसेना आणि भाजपने एकमेकांना भ्रष्टाचारी म्हणून जाहीर प्रमाणपत्रच दिले आहे. स्वाभिमान जपायचाच असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे. सत्तेत राहण्यात अर्थच उरला नसताना, शिवसेना घटक पक्ष म्हणून सत्तेत आहे. एवढी लाचारी शिवसेना नेते का करीत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांचा कसला नाईलाज आहे, हेसुद्धा कळत नाही. आम्ही समाज एकत्र बांधलापन्नास वर्षे कॉँग्रेस आणि आघाडी सरकारने मराठा समाजाला काय दिले, असा सवाल काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आम्ही जे दिले, ते सांगण्यासाठी वेळही पुरणार नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांत आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्यात यश मिळविले.