शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘कडेगाव कृ षी’चा अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

शेतकऱ्यांतून मागणी : निकृष्ट बंधाऱ्यांची पाहणी करावी

गणेश पवार - नेवरी --कडेगाव तालुक्यात ताकारी, टेंभू योजनेमुळे शेतकरी शेती व्यवसायावर जास्त भर देऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे बऱ्याच प्रकारचे प्रस्ताव धूळ खात कार्यालयात पडून आहेत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कृषी विभागाचा कारभार अनागोंदी झाला असून, तालुका कृ षी अधिकारी एन. टी. पिंजारी व संबंधित अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील निकृष्ट बंधाऱ्यांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांतून कृषी विभागाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासूून या विभागाकडून शेतकऱ्यांच्या पदरी केराच्या टोपल्या देण्यात आल्या आहेत. कृषी विभागामार्फत राज्याकडून आलेल्या नवनवीन योजना तालुक्यातील पांढरपेशी लोकांनाच वाटल्या जातात. बऱ्याचदा शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत शेततळी, पॅक हाऊस, माती बंधारे, सिमेंट बंधारे असे विविध प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे विचारणा केली असता, या प्रस्तावाला निधी उपलब्ध नसल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जाते. कृषी विभाग हा पांढरपेशी लोकांसाठी असून त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मग कृषी विभाग कसला? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे. कडेगाव कृषी विभागाच्या कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे भरलेली आहेत. बऱ्याच दिवसांपासून १४ पदे रिक्त असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तालुक्यात एकूण २४ सजा असून त्यांची २ मंडले तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये अंबक, कडेगाव ही प्रमुख आहेत.कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी दिलीप होलमुखे, अनिल फोंडे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराला हाताशी धरल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे अधिकारी बऱ्याचदा कार्यालयात हजर नसतात. स्वत:च्या कामाकरिता ते परगावी गेलेले दिसून येतात. कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित अधिकारी हे कार्यालयाच्या कामकाजासाठी बाहेर गेले आहेत, अशी खोटी माहिती मिळत आहे. मनमानी कारभाराला वैतागलेकृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले असून याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचा लाभ मिळावा अशी सोय करावी तसेच तालुक्यातील झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.