शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘कडेगाव कृ षी’चा अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

शेतकऱ्यांतून मागणी : निकृष्ट बंधाऱ्यांची पाहणी करावी

गणेश पवार - नेवरी --कडेगाव तालुक्यात ताकारी, टेंभू योजनेमुळे शेतकरी शेती व्यवसायावर जास्त भर देऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे बऱ्याच प्रकारचे प्रस्ताव धूळ खात कार्यालयात पडून आहेत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कृषी विभागाचा कारभार अनागोंदी झाला असून, तालुका कृ षी अधिकारी एन. टी. पिंजारी व संबंधित अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील निकृष्ट बंधाऱ्यांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांतून कृषी विभागाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासूून या विभागाकडून शेतकऱ्यांच्या पदरी केराच्या टोपल्या देण्यात आल्या आहेत. कृषी विभागामार्फत राज्याकडून आलेल्या नवनवीन योजना तालुक्यातील पांढरपेशी लोकांनाच वाटल्या जातात. बऱ्याचदा शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत शेततळी, पॅक हाऊस, माती बंधारे, सिमेंट बंधारे असे विविध प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे विचारणा केली असता, या प्रस्तावाला निधी उपलब्ध नसल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जाते. कृषी विभाग हा पांढरपेशी लोकांसाठी असून त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मग कृषी विभाग कसला? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे. कडेगाव कृषी विभागाच्या कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे भरलेली आहेत. बऱ्याच दिवसांपासून १४ पदे रिक्त असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तालुक्यात एकूण २४ सजा असून त्यांची २ मंडले तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये अंबक, कडेगाव ही प्रमुख आहेत.कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी दिलीप होलमुखे, अनिल फोंडे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराला हाताशी धरल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे अधिकारी बऱ्याचदा कार्यालयात हजर नसतात. स्वत:च्या कामाकरिता ते परगावी गेलेले दिसून येतात. कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित अधिकारी हे कार्यालयाच्या कामकाजासाठी बाहेर गेले आहेत, अशी खोटी माहिती मिळत आहे. मनमानी कारभाराला वैतागलेकृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले असून याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचा लाभ मिळावा अशी सोय करावी तसेच तालुक्यातील झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.