शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘कडेगाव कृ षी’चा अनागोंदी कारभार

By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST

शेतकऱ्यांतून मागणी : निकृष्ट बंधाऱ्यांची पाहणी करावी

गणेश पवार - नेवरी --कडेगाव तालुक्यात ताकारी, टेंभू योजनेमुळे शेतकरी शेती व्यवसायावर जास्त भर देऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे बऱ्याच प्रकारचे प्रस्ताव धूळ खात कार्यालयात पडून आहेत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कृषी विभागाचा कारभार अनागोंदी झाला असून, तालुका कृ षी अधिकारी एन. टी. पिंजारी व संबंधित अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील निकृष्ट बंधाऱ्यांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांतून कृषी विभागाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासूून या विभागाकडून शेतकऱ्यांच्या पदरी केराच्या टोपल्या देण्यात आल्या आहेत. कृषी विभागामार्फत राज्याकडून आलेल्या नवनवीन योजना तालुक्यातील पांढरपेशी लोकांनाच वाटल्या जातात. बऱ्याचदा शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत शेततळी, पॅक हाऊस, माती बंधारे, सिमेंट बंधारे असे विविध प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे विचारणा केली असता, या प्रस्तावाला निधी उपलब्ध नसल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जाते. कृषी विभाग हा पांढरपेशी लोकांसाठी असून त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मग कृषी विभाग कसला? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे. कडेगाव कृषी विभागाच्या कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे भरलेली आहेत. बऱ्याच दिवसांपासून १४ पदे रिक्त असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तालुक्यात एकूण २४ सजा असून त्यांची २ मंडले तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये अंबक, कडेगाव ही प्रमुख आहेत.कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी दिलीप होलमुखे, अनिल फोंडे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराला हाताशी धरल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे अधिकारी बऱ्याचदा कार्यालयात हजर नसतात. स्वत:च्या कामाकरिता ते परगावी गेलेले दिसून येतात. कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित अधिकारी हे कार्यालयाच्या कामकाजासाठी बाहेर गेले आहेत, अशी खोटी माहिती मिळत आहे. मनमानी कारभाराला वैतागलेकृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले असून याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचा लाभ मिळावा अशी सोय करावी तसेच तालुक्यातील झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.