शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

केंद्राने शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

डफळापूर येथे जलबिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शेतकरी व पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. या वेळी नरेंद्र चुघ, वनाधिकारी विजय ...

डफळापूर येथे जलबिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शेतकरी व पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. या वेळी नरेंद्र चुघ, वनाधिकारी विजय माने, तहसीलदार बी. जी. गोरे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : केंद्र सरकारने नव्याने केलेले तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत, त्यामुळे ते रद्द करावेत अशी मागणी जलबिरादरीचे संस्थापक डाॅ. राजेंद्र सिंह राणा यांनी केली. जलबिरादरीचे महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र चुघ यांच्यासोबत त्यांनी बुधवारी अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे लोकसहभागातून २५ हेक्टर वनजमिनीवर राबविलेल्या मियावाकी वनराई प्रकल्पालाही भेट दिली. वनराईतील जैवविविधतेबद्दल समाधान व्यक्त केली. कोकळे येथे महांकाली नदीवर व ओढ्यावर लोकसहभागातून प्रत्येकी पाच बंधारे जलबिरादरीने बांधले आहेत. त्याचीही पाहणी केली. ते म्हणाले, दुष्काळी भागाचा लोकांनी कायापालट केला करून गावे पाणीदार केली आहेत. ही ओळख टिकविण्यासाठी पीक पद्धती बदलावी लागेल. जास्त पाण्याच्या पिकांमुळे पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांनी हरभरा, तूर, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भाजीपाला अशी कमी पाण्याची पिके घ्यावीत.

दरम्यान, जलबिरादरी व लोकसहभागातून डफळापूर, खलाटी, कुडनूर, मिरवाड व शिंगणापूर येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू करण्याचा निर्णय या वेळी झाला. यावेळी वन अधिकारी विजय माने म्हणाले, गावे हिरवीगार बनविण्यासाठी लोकांनी सहभाग घ्यावा.

या कार्यक्रमाला बिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुघ, तहसीलदार बी. जी. गोरे, जलसाक्षरता केंद्राचे प्रशिक्षक रमाकांत कुलकर्णी, जलबिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर, बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर, जत पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, माजी सभापती मन्सूर खतीब, डफळापूरचे सरपंच परशुराम चव्हाण, हनुमंत कोळी, नेचर काॅन्झर्वेशन सोसायटीचे डाॅ. हर्षद दिवेकर, बालाजी चव्हाण, सागर साळुंखे, सागर पाटील, अग्रणी पानी फाऊंडेशनचे शिवदास भोसले आदी उपस्थित होते.