शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

मराठ्यांना आरक्षणासाठी केंद्राने घटनेत दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता केंद्र सरकारनेच घटनेत दुरुस्ती करावी आणि आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा ...

सांगली : मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता केंद्र सरकारनेच घटनेत दुरुस्ती करावी आणि आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केली. भाजप सरकारने कायद्यात त्रुटी ठेवल्यानेच तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाविषयी केंद्र सरकारने टाळाटाळ केल्यास राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारने २०१८ मध्ये घटनेत दुरुस्ती केल्यानंतर कोणत्याही राज्य सरकारला आरक्षणाचा अधिकार उरलेला नाही. सर्व सूत्रे केंद्राच्या हाती गेली आहेत. या स्थितीत मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी आता केंद्राकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारने निवडणुका समोर ठेऊन आरक्षणाचा कायदा केला, पण तो परिपूर्ण नव्हता हे आता सिद्ध झाले आहे. आरक्षणासाठी नेमलेली मागासवर्गीय समितीदेखील बेकायदेशीर होती. एकूणच सारा प्रकार मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा होता.

साळुंखे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी केंद्राने आता कायदेशीर प्रक्रिया राबवावी. विधेयकाला लोकसभा व राज्यसभेत संमती मिळवून राष्ट्रपतींची स्वाक्षरी घ्यावी. कायदा सक्षम व्हावा यासाठी मागासवर्गीय आयोगाची संमतीही घ्यावी. ॲट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात काही बदल सुचविले होते. मागासवर्गीय समाज त्याविरोधात रस्त्यावर उतरला, आंदोलने केली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करुन ॲट्रॉसिटीला संरक्षण दिले. तोच पॅटर्न आता मराठा आरक्षणासाठीही वापरावा. अन्यथा कोरोनानंतर संपूर्ण मराठा समाज पुन्हा रस्त्यावर येईल. हा उद्रेक निर्णायक असेल.

चौकट

साळुंखे म्हणाले की, भाजप सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही टिकणार नाही हे स्पष्ट होते. याला भाजपची नीती कारणीभूत आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजप सरकार असताना मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यात आला.