शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

सीबीआयने गेल्या चार वर्षांतील प्रकरणांचीही चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST

सांगली : उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत सीबीआयकडून चौकशीचा निर्णय दिल्याने चौकशी होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला ...

सांगली : उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत सीबीआयकडून चौकशीचा निर्णय दिल्याने चौकशी होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. सीबीआयनेही आता या प्रकरणाची योग्य ती निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशीच अपेक्षा आहे. सीबीआयने गेल्या चार वर्षांतील प्रकरणांचीही चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सोमवारी दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सीबीआयकडून चौकशी झाल्यानंतर बरेच खुलासे समोर येणार आहेत. मात्र, सीबीआयनेही गेल्या चार वर्षांतील प्रकरणांची निष्पक्षपातीपणे चौकशी करणे अपेक्षित आहे.

देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत माझ्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेऊन राजीनाम्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्व लोक हे लोकशाहीची बूज राखणारे आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी पूर्ण होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला असून, यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर आली, असे अजिबात म्हणता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

चौकट

वाझेचा तत्कालीन आयुक्तांशीच जास्त सहवास

अटकेत असलेला अधिकारी काय बोलतो, याबाबत सांगणे योग्य नाही. मात्र, त्याने मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेले वाहन, मनसुख हिरेनची हत्या याबाबत एनआयए तपास करत असून, माहितीवर आधारित शहानिशाही होईल. वाझे अलीकडेच सेवेत आलेला अधिकारी असल्याने सरकारशी सहवास नव्हता. याउलट मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांशीच त्याचा जास्त सहवास असल्याचीही टिपणीही जयंत पाटील यांनी केली.